शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

जलेश्वर तलावाच्या क्षेत्रातील १९५ अतिक्रमणधारकांना तहसीलची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 9:07 PM

नवीन अतिक्रमणांकडे दुर्लक्ष 

ठळक मुद्देनगरपालिकेकडून तंबी कारवाईसाठी हालचाली सुरु

हिंगोली : जलेश्वर तलावाच्या पाळूवर व बुडित क्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्या १९५ जणांना तहसील कार्यालयाकडून पुन्हा एकदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र नवीन अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई तहसीलने केली नाही. नगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी करून हे अतिक्रमण हटविण्यास सांगितल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

हिंगोली नगरपालिकेच्या वतीने यापूर्वी जलेश्वर तलावातील गाळ काढण्याची व सुशोभिकरणाची काही कामे झाली होती. मात्र ती टिकली नाहीत. दोन वर्षांपासून पुन्हा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र यात आधी अतिक्रमणधारकांची बाधा येत होती. त्यांनी तेव्हापासून अतिक्रमण हटविण्यास नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र सुशोभिकरणाचा प्रस्ताव मंजूर नसल्याने याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे अतिक्रमणधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यांच्यासाठी जागा घेण्याची तयारीही नगरपालिका करीत होती. मात्र अव्वाच्या सव्वा दराचे प्रस्ताव सभेसमोर आल्याने ते फेटाळले गेले. आता न.प.ने पुन्हा सहा एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले. त्यातून जुन्या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन होईल. तर नवे काढून टाकण्यास सांगितले असून यासाठी अभियंत्यांना तलाबकट्टा भागात पाठविले होते, असे ते म्हणाले. तर या भागात यापुढे अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यास न.प.च्या यंत्रणेलाही सांगितले.

आमदारांना भेटले शिष्टमंडळया नोटिसा मिळाल्यानंतर सैरभैर झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज आ.तान्हाजी मुटकुळे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. त्यानंतर या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी चर्चा केली. लवकरच या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळू शकते, असे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांचीही उपस्थिती होती.