शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आता कोविशिल्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:31 AM

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.१५ लाख जणांचे लसीकरण झालेले आहे. मात्र यादरम्यान अनेकदा लसीकरणाचे नियम बदलत गेले. सुरुवातीला फक्त आरोग्य ...

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.१५ लाख जणांचे लसीकरण झालेले आहे. मात्र यादरम्यान अनेकदा लसीकरणाचे नियम बदलत गेले. सुरुवातीला फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली. नंतर फ्रंटलाइन वर्कर आले. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ, नंतर ४५ वर्षांवरील गंभीर आजारी व काही दिवसांनी ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याचे जाहीर केले. तरीही लसींचा पुरवठा होत नव्हता. त्यानंतर अचानक १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे जाहीर केले. सगळीकडेच लस घेण्यासाठी रांगा लागल्या. तरुण वर्गाची संख्याही जास्त आहे. शिवाय लसीकरणासाठी या मंडळीचा उत्साहही तेवढाच दांडगा होता. त्यानंतर त्या तुलनेत लसींचा पुरवठा न झाल्यास दुसऱ्या डोसची अडचण होईल, या भीतीने १८ ते ४५ वर्षांच्या लोकांचे लसीकरणच थांबविले आहे. ४५ ते ५६ दिवसांपर्यंत कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यास सांगितले होते. आता ८४ दिवसांवर नेले आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे म्हणाले, मागील दोन दिवसांपासून या वेबसाइटवर दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी ८४ दिवसांचा नियम लागू झाला आहे. त्यापूर्वी अपॉइंटमेंटच मिळत नाही. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी रांगेत लागणाऱ्यांनी नाहक वेळ वाया न घालता ८४ दिवसांनंतर येण्याची आवाहनही त्यांनी केले. या नव्या नियमामुळे अनेकजणांना आता पुन्हा जवळपास महिनाभराचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. सुरुवातीला तर २८ दिवसांनंतरच दुसरा डोस देण्यात आला होता. वारंवार बदलणाऱ्या या नियमांमागे खरेच शास्त्रीय कारण आहे की, लसींचा तुटवडा असल्याने असा बदल होतोय? असा सवाल केला जात आहे.