शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २२ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:33 AM

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर ...

हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर जगभर कोरोनाचा कहर वाढल्याने शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. त्यात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर बारावीच्या परीक्षांचे भिजत घोंगडे कायम आहे. मागील वर्षभरात नर्सरीच्या मुलांना तर बडबडगीत अथवा पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडेही मिळाले नाही. ग्रामीण भागातील अंगणवाड्याही बंद आहेत. मोठ्या इंग्रजी शाळांत एकीकडे मोठे शुल्क भरूनही केजी १ व २ च्या विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेत जाता आले नाही. या वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण देणेही तेवढेच अवघड होते. मात्र, त्यातही काही ठिकाणी प्रयोग झाले. ते कितपत यशस्वी ठरले हे आगामी काळातच कळणार आहे. मात्र, तूर्त तरी हे वर्ग म्हणजे सोपस्कारच होते, असे चित्र आहे. आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. या लाटेत तर लहान मुलांनाच जास्त धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम म्हणून तयारी सुरू झाली आहे. प्रशासन लहान मुलांच्या आरोग्यासाठी यंत्रणा उभी करत आहे. त्यामुळे शाळा सुरू करून संक्रमणवाढीचा धोका पत्करला जाण्याची शक्यता कमीच आहे.

जिल्ह्यातील नर्सरी टू केजीच्या शाळा १०८९

२०१८-१९

विद्यार्थीसंख्या २२११२

२०१९-२०

विद्यार्थीसंख्या २३१८५

२०२०-२१

विद्यार्थीसंख्या २२८५२

मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी

मुलांना शाळेची ओळखच ऑनलाइनमुळे होत नसल्याचे दिसत आहे. त्यातच सतत घरी राहूनच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे माेबाईलचा अनावश्यक वापरही वाढू शकतो. त्यामुळे पालकांनीही स्वत:हून त्यांना अभ्यास व वेगळे राहून खेळता येणाऱ्या खेळात गुंतविले पाहिजे.

-देवीदास गुंजकर

वर्षभर कुलूप; यंदा?

मागच्या वर्षी ऑनलाईन नियोजन करून नर्सरी ते केजीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. त्यांना थेट शिक्षक शिकवितात. यात पालकांना थोडा त्रास होतो. त्यांची परीक्षाही घेतली. यंदाही परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे ऑनलाइन घेण्याचे नियोजन करावे लागेल. शाळेची अनुभूती मिळावी, अशी काळजी घेतली.

-गजेंद्र बियाणी, संस्थाचालक

सरत्या वर्षातही ऑनलाइन वर्ग चालवूनच नर्सरी ते केजीच्या मुलांनाही शिक्षण दिले. त्यात अडचणी आल्या. मात्र, पालकांना सूचना देत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑनलाइनच शिक्षण द्यावे लागेल, असे दिसते.

दिलीप चव्हाण, संस्थाचालक

गेल्या र्षी नर्सरीपासून ते सर्वच वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागले. यंदाही तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे लसीकरण करून ही वेळ येणार नाही. याची काळजी घ्यावी. हा एकमेव उपायच सध्या तरी दिसत आहे.

दिलीप बांगर, संस्थाचालक

पालकही परेशान

कृतीयुक्त, मनोरंजक शिक्षणाची केवळ औपचारिकता ऑनलाइनमधून पूर्ण होते. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष जात नाही. त्यामुळे मुलांना न्यूनगंड निर्माण होण्याची भीती आहे.

उमेश कुटे, पालक

नर्सरी ते केजीची मुले लहान असतात. त्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचीच गरज आहे. मात्र, नाईलाजाने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यावरही लक्ष ठेवावे लागते.

देवदत्त देशपांडे, पालक

शाळेत गेल्यावर शिक्षकांसमोर गांभीर्य असते. ऑनलाइनमध्ये ते गांभीर्य उरत नाही. परीक्षाही ऑनलाइनमुळे मुलांची खरी गुणवत्ता कळत नाही.

-श्रीपाद गारुडी, पालक