शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

२२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:22 AM

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये ...

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये चालक, वाहकाव्यतिरिक्त २२ प्रवासी बसविण्यात येऊन कोरोनाचे नियम पाळले जातील, अशी माहिती हिंगोली आगाराचे स्थानक प्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांपासून एस.टी.महामंडळ कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. दीड वर्षात कोट्यवधींचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलावले जात आहेत. ज्यांना कामावर बोलावले नाही, अशांनी बाहेर न फिरता घरीच बसावे, असेही महामंडळाने कर्मचाऱ्यांना कळविले आहे. आजमितीस कोरोना महामारीमुळे डिझेलचा खर्चही निघणे अवघड होऊन बसले आहे. बसेस बाहेर नाही काढल्यास जागेवरच गंज खातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न महामंडळाला पडला आहे. आजमितीस तरी महामंडळ आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामंडळाने बसेस पर जिल्ह्यात सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून महामंडळ २४ मेपासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात यशस्वी झाले आहे. परजिल्ह्यातील प्रवासी भेटल्यासच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारी कमी आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच महामंडळाची बस पाठविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, असे महामंडळाने सांगितले.

आगारातून बस बाहेर काढते वेळेस सॅनिटायझर आणि पाण्याने स्वच्छ करून घेतली जात आहे. यासाठी काही ठराविक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच कर्मचारी आगारातून एसटी बाहेर सोडत आहेत. प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. बसमध्ये चढते वेळेस प्रवाशाला मास्क नसेल तर त्यास खाली उतरविण्यात यावे, अशीही सूचना चालक-वाहकांना देण्यात आली आहे.

शहर बस थांबे केले बंद .....

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बस थांबे बंद करण्यात आले आहेत. चालक-वाहकांनी बस थांब्यावर न थांबविता सरळ बसस्थानकात आणावी. यानंतर बसमधील प्रवाशांची चाचणी करून घरी सोडण्यात यावे, अशीही सूचना चालक, वाहकाला दिली आहे.

पर जिल्ह्यातील प्रवासी मिळाले तरच एस.टी. बसेस बाहेर सोडण्यात येत आहेत. अन्यथा जिल्हांतर्गतच बसेस सुरू आहेत, अशी माहिती कळमनुरीचे आगार प्रमुख अभिजित बोरीकर आणि वसमतचे आगार प्रमुख अनिल निकाळजे यांनी दिली.

उत्पन्न वाढीसाठी सर्वच जण प्रयत्नशील....

गत दीड वर्षापासून एस.टी. महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. अशा परिस्थितीत सर्वच कर्मचारी महामंडळाला प्रवासी कसे मिळतील याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे ड्यूटीवरील कर्मचारी मास्क घालून कामावर येत आहेत. सर्वांनाच कोरोनाचे नियम बंधनकारक केले आहेत.

-डी. आर. दराडे, एसटी कामगार सेना विभागीय सचिव