शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

कृषी आयुक्तांनी दिले फळपीक विमा मंजुरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:17 AM

हिंगोली जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्याचा फटका केळी पिकास बसला. ...

हिंगोली जिल्ह्यात २१ ते २५ एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होते. त्याचा फटका केळी पिकास बसला. त्यामुळे विमा कंपनीने काही भागांसाठी विमाही मंजूर केला. मात्र, डोंगरकडा मंडळात दोन दिवस तापमानात ०.१४ अंशांचा फरक आल्याने विमा नाकारला होता. तर शेजारच्या गिरगांव मंडळात मात्र याच काळात सलग पाच दिवस तापमानाची नोंद ४५ अंश सेल्सिअस झाली होती. त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रातच तांत्रिक अडचण असल्याचा मुद्दा उपस्थित करून याची चौकशी करून संबंधितांना विमा देण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी कृषी आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून परभणी कृषी विद्यापीठामार्फत स्वयंचलित हवामान केंद्राची चौकशी झाली. त्यात वडगाव येथील हवामान केंद्रानजीक बांधकाम व सभोवतालच्या झाडांमुळे तापमानाच्या नोंदीत फरक पडू शकतो, असा निष्कर्ष त्यांनी दिलेल्या अहवालात मांडला आहे. त्यामुळे अल्पशा फरकामुळे या शेतकऱ्यांचा विमा नाकारला जावू नये. तो मंजूर करण्यात यावा, असे पत्र कृषी आयुक्तांनी कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. त्यामुळे आता तो निकाली निघण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.