शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रागामुळेच जवळची माणसे तुटतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:39 IST

राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग आणि व्यक्तीमधील नेहमी असणारा चिडचिडेपणा विविध आजारांना निमंत्रण देतोच. शिवाय रागाचा विपरित परिणाम शरीरावर होऊन मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे प्रत्येकाने राग-द्वेष दूर सारून एकोप्याने राहावे, असा सल्ला डॉ. यशवंत पवार यांनी दिला.राग आणि त्याचा मनावर व शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे माहित असतानाही अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून राग येतोच. परंतु हाच राग किती घातक असतो ! रागाच्या भरात अनेकांकडून गंभीर गुन्हे घडतात. म्हणजेच सामाजिक सलोख्यावरही रागाचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे याच रागाला आता मकरसंक्रांत सणातील गोडव्याच्या साह्याने हद्दपार करून सकारात्मक वाटचालीकडे पाऊल टाकण्याची सर्वांना जणूकाही संधीच असल्याचे मत डॉ.पवार यांनी व्यक्त केले. सणापुरताच गोडवा न राहता तो कायम राहावा हाच संक्रांतीचा उद्देश असतो. परंतु असे होताना दिसून येत नाही. त्यामुळे या मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आप-आपसातले मतभेद कायमचे विसरण्याचा संकल्प केला पाहिजे. ते म्हणाले, राग आणि चिडचिडेपणामुळे माणसं तुटतात. मानसिक आरोग्य बिघडते. हृदयाचे ठोके वाढून विविध आजार जडतात. गंभीर म्हणजे मेंदूविकार किंवा रक्तदाबाने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवावे, असा वैद्यकीय सल्लाही दिला.रागाच्या भरात झालेल्या नुकसानीची इतिहासात अनेक उदाहरणे असतील. मात्र आज धावपळीच्या जीवनात राग अनेक आजारांना निमंत्रण देते. वैद्यकीय सेवेत असल्याने रोज या बाबी पाहतो. त्यामुळे लोकमतच्या गुड बोला, गोड बोला उपक्रम अंगीकारण्याची खरेच गरज आहे.

टॅग्स :SocialसामाजिकLokmat Eventलोकमत इव्हेंट