शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By रमेश वाबळे | Updated: January 18, 2024 19:45 IST

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन

हिंगोली : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने १८ जानेवारी रोजी  येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात चालली आहे. अनेक वेळा लागवडही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न सोडविण्याकडे सरकार कानाडोळा करीत असून, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

यात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, तसेच नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा प्रमुख उत्तमराव वाबळे, देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, प्रल्हाद राखुंडे, मुंजाराव बेंगाळ, महादराव चव्हाण, जनार्दन राखोंडे, खंडबाराव नाईक, शेषराव कदम, साहेबराव आसोले, डिगांबर आहेर, मुरलीधर कदम, कानबाराव पोले, बळीराम कागणे, रमेश गरड, परबतराव माने, नागोराव पडोळे, शेषराव राखोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलकांची खा. हेमंत पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी