शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: May 8, 2024 16:09 IST

कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत.

हिंगोली : हिंगोली शहरातील पेन्शनपूरा भागातून पोलिसांनी तब्बल ४२ जनावरे संशयावरून पकडली. सर्व जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या आवारात बांधली आहेत. ही कारवाई ७ मे रोजी रात्री करण्यात आली.  दरम्यान, जनावरांचा दाखला दाखवून जनावरे घेऊन जाण्याचे आवाहन करूनही बुधवारी दुपारपर्यंत कोणी दाखला आणला नव्हता. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहेत. 

शहरातील पेन्शनपूरा भागात काही घराजवळ जनावरे बांधलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आल्याचा संशय असल्याने पोलिसांनी जनावरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, निरीक्षक विकास पाटील, नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बोधगिरे, उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार संभाजी लकुळे, अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, संजय मार्के यासह स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी, अंमलदारांचा ताफा मंगळवारी रात्री पेन्शनपुरा भागात दाखल झाला. 

यावेळी पाहणी केली असता तब्बल ४२ जनावरे आढळून आली. काही जणांकडे जनावरांबाबत चौकशी केली असता समाधाकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सर्व ४२ जनावरे ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणली. यावेळी काही जणांनी ही जनावरे आपल्या मालकीची असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जनावरांचे दाखले दाखविण्याच्या सूचना केल्या. मात्र ८ मे रोजी दुपारपर्यंत कोणीही जनावरांचे दाखले दाखल करू शकले नाहीत. 

पोलिस ठाण्यातच चाऱ्या,पाण्याची सोयदरम्यान, पोलिस ठाण्यात जनावरे आणून बांधली आहेत. दाखला दाखविल्यानंतरच मूळ मालकाला जनावरे सुपूर्द केली जाणार आहेत. बुधवारी दुपारपर्यंत कोणीही दाखला दाखल केला नसल्यने पोलिस ठाण्याच्या आवारातच जनावरे बांधली आहेत. येथेच हिरवा चारा, पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पोलिस अधिकारी, अंमलदारांनी सकाळी हिरवा चारा जनावरांना टाकला होता. 

...तर  गोशाळेत जनावरे होणार दाखलकोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत. या जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात आली असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी काही जणांची चौकशीही सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र चौकशीनंतरच जनावरे कोणी आणली, कोणाची आहेत हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली