शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

दहा बालविवाह रोखले; दोन बाल विवाहांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:24 AM

परभणी : मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून १० बालविवाह रोखण्यात आले तर ...

परभणी : मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून १० बालविवाह रोखण्यात आले तर २ बाल विवाहांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका स्तरावर महिला बालकल्याण तसेच गाव पातळीवर ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने नेमले आहे. कळमनुरी तालुक्यात धारधावंडा २, महालिंगी १, कळमनुरी येथील इंदिरानगर येथे १, वसमत तालुक्यात सेलू १, बोराळा १, इंजनगाव १, हिंगोली तालुक्यात कलगाव १, पेडगाववाडी १, लोहगाव १ असे १० बालविवाह रोखण्यात आले. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे १, वसमत तालुक्यातील माळवटा येथे १ असे दोन बालविवाह झाले. या दोन्ही बाल विवाहांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीब खान पठाण, सचिन पठाडे, रेश्मा पठाण यांनी १० बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला.

दहा विवाह रोखले

मार्च ते डिसेंबर २०२० या दहा महिन्यांच्या काळात दहा बालविवाह रोखण्यात आले आहेत. याबाबतची माहिती महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाली होती. या आलेल्या अर्जांची योग्यरितीने छाननी करुन जिल्ह्यात होणारे दहा बालविवाह रोखण्यात आले. दोन बाल विवाहांवर नियमाप्रमाणे पोलिसांकडे तक्रार करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात ४५० बालसंरक्षक समित्या पाहतात काम

बालकांचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्ह्यात ४५० ग्राम बाल संरक्षक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या बालकांचे विवाह रोखण्यात नेहमीच मदत करतात. या समित्यांमार्फत बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीही केली जाते. बालकांचे संरक्षण करण्यात समित्या पुढाकार घेतात.

हिंगोली जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समित्या जवळपास ४५० आहेत. बालविवाह कुठे होत असेल व त्यासंदर्भात कोणी अर्ज केला तर त्या अर्जाची छाननी करुन महिला व बालविकास विभागातर्फे त्याठिकाणी पथक पाठविले जाते. बालविवाह होत असेल तर नियमाप्रमाणे पोलिसांमध्ये नोंद केली जाते.

-विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

बालकांचे संरक्षण होणे गरजेचे

बाल संरक्षण याचा अर्थ केवळ बाल हक्कांचे संरक्षण करणे, असा नाही तर समाजात बाल संरक्षणाची वातावरण निर्मिती करणे होय. बालविवाह रोखण्याची जबाबदारी शासनाबरोबर सर्वांची आहे. हा कायदा बालकांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने केला आहे.