शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपमध्ये बंडखोरी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याचा अजूनही काही ताळमेळ नाही. मात्र जी मंडळी कामाला लागली त्यापैकी अनेकजण आता पक्षाने तिकिट नाही दिले तर अपक्ष रिंगणात राहण्याची भाषा करीत आहेत. युती नाही झाली तरीही कुणी रिंगणात राहते की काय, याची चिंता असताना न झाल्यास बंडखोरी अटळ दिसत आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये इनकमींग जोरात होते. त्यातही शिवसेनेत जुनेच कमी नव्हते म्हणून त्यांनी नव्यांना विधानसभेच्या दृष्टीने पक्षात घेण्याचे हिंगोली वगळता इतरत्र टाळलेच. मात्र भाजपला हिंगोली वगळता इतरत्र कोणताच चेहरा नसल्याने मागच्या विधानसभेपासून सुरू असलेले इनकमींग अजूनही सुरूच आहे. शिवसेना व भाजपमध्ये सर्वाधिक वादाची ठिणगी पडलेली आहे ती कळमनुरी व वसमत या सेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये. हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडून हिसकावण्यासाठी भाजपची साम, दाम, दंड, भेदची नीती दिसत आहे. मात्र कळमनुरीत त्यातही अडचण आहे. हा मतदारसंघ आम्हाला सोडा म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर अडून बसले आहेत. युती झाली अन् रासपला मतदारसंघ सुटला तर विनायक भिसे यांना उमेदवारी मिळते की ऐनवेळी उमेदवार आयात केला जातो, हा वेगळाच प्रश्न आहे. मात्र त्यानंतर सेनेचे संतोष बांगर, भाजपचे अ‍ॅड.शिवाजी माने, गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख यांना लढल्याशिवाय चैन पडेल, असे दिसत नाही. युती नाही झाली तरीही भाजपऐवजी रासप आली तर हा प्रश्न पुन्हा भाजपीयांसमोर कायमच राहणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ किमान एक ते दोन बंडखोरांना जन्म घालण्याची चिन्हे आहेत.वसमतमलाही वेगळे चित्र नाही. युती झाली तर ही जागा अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासाठी भाजप सोडवून घेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. मग सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा गप्प बसणे शक्यच नाही. तर काहीजण जाधव यांचे सेनेचे खा.हेमंत पाटील यांच्याशी लोकसभेला सख्य वाढल्याने जाधवच सेनेचे उमेदवार असतील, असेही सांगू लागले आहेत. दुसरे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकामाच्या निविदा उघडण्यास विरोधासाठी भाजपच्या मंडळींना मदत म्हणून खा.पाटील यांचेही पत्र होतेच. यामुळे आ.मुंदडा व खा.पाटील एका मंचावर बसून हसतमुखाने टाळी देत असले तरीही ओठात एक अन् पोटात एक अशी गत आहे. जाधव यांच्या नावाचा मात्र अनेकदा खेळण्याप्रमाणे सोयीस्कर वापर होत आला आहे. शेवटी सगळ्याच आघाड्यांवर फासे उलटे पडले तरीही जाधव अपक्ष लढतील. ते स्वत:च हे सांगत आहेत.यावरून वसमत व कळमनुरीत भाजप शिवसेनेशी वेगळाच गेम खेळत असल्याचेही नाकारता येत नाही. हिंगोलीत सेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर या इच्छुक असल्या तरीही त्यांची तिकिटावरच भिस्त दिसत आहे. अपक्ष म्हणून त्या लढतील व भाजप इतर ठिकाणी वापरत असलेल्या रणनीतीप्रमाणेच डाव देतील, अशी चिन्हे नाहीत. सेना दबावतंत्र म्हणूनही कुठे हे शस्त्र वापरताना दिसत नाही.... तर पक्षश्रेष्ठी दखल घेणारशिवसेनेच्या जागांवर दावा करून आम्हीच येथे विजयी होण्यासारखी स्थिती असल्याचे भाजप सांगत आहे. मात्र सेनेने जागा सोडणेच शक्य नसल्याने जर अशा ठिकाणी भाजपच्या कुणी बंडखोरी केली तर युतीधर्माला कलंक लागणार आहे. अशावेळी पक्षश्रेष्ठी दखल घेणार का? हा प्रश्न आहे.युती झाली तर युतीचा धर्म पाळू असे शिवसेनेकडून तरी ऐकायला मिळते. भाजपची मंडळी तसे काहीच बोलत नाही. मात्र जेथे अन्यायच झाल्याचे स्पष्ट चित्र दिसेल, तेथे शिवसेनेच्या कुणी बंडखोरी तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.पक्षीय तिकिटांसाठी सेना-भाजपमध्ये मारामार चालली असली तरीही मतदारांच्या मनात काय चालले, याचा अजून थांग लागत नाही. युतीला जेवढे सोपे वाटते तेवढे तरी ग्रामीण भागातील प्रतिक्रियांवरून दिसत नाही. शहरी भागातील झगमगाटावरून काढलेल्या अनुमानातूनच काहीजण लावत असलेले अंदाजही चुकण्याची भीती आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक