शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:35 IST

मनोज जरांगे यांचे मत; हिंगोलीत माध्यमांशी साधला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आरक्षणासाठी आत्तापर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली असून, स्वत:च्या लेकराबाळांना न्याय मिळावा, यासाठी हा शांततेच्या मार्गाने केलेला आक्रोश आहे. आरक्षण हक्काचं असून, ते घेतल्याशिवाय आता मराठे शांत बसणार नाहीत, असे मत मनोज जरांगे - पाटील यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

मराठा आरक्षण शांतता संवाद रॅलीच्या निमित्ताने जरांगे ६ जुलै रोजी हिंगोलीत आले होते. दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे असून, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. मराठा कुणबीच्या तब्बल ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. प्रारंभापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे. यात ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही. जर नोंदी सापडल्या आहेत तर फुकट भांडण कशासाठी, असे आता ओबीसी बांधवांनाही वाटत असून, छगन भुजबळांची भूमिका त्यांनाही पटत नसल्याचे जरांगे म्हणाले.मराठा समाज कधीच कोणावर रूसला नाही. आरक्षणाची मागणी हक्काची असून, ती सरकारने समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेतील, असा विश्वास आहे. परंतु, मराठा आरक्षण प्रश्नी चालढकल केली तर सरकारला ते जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आत्महत्या करू नका...आरक्षण आपल्या हक्काचं असून, ते आज ना उद्या मिळणारच आहे. परंतु, तरुणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. तुम्हीच जर आत्महत्या करीत असाल तर आरक्षण मागायचं कुणासाठी? आपल्या आत्महत्येमुळे अख्खं कुटुंब उडघ्यावर येते, त्यांचा विचार आपण करायला हवा. आरक्षणासाठी यापेक्षाही मोठा लढा उभारायची ताकद मराठा समाजात आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोली