शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

वाढीव दराने घेतलेली खताची रक्कम परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:23 AM

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते ...

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते खरेदी करावी लागली. अशांची रक्कम परत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात ठिय्या देण्यात आला. यावेळी सेनगाव कृषी कार्यालयाचे पथक पाठवून दुकानदारांना रक्कम परत करायला लावू, असे आश्वासन अधीक्षकांनी दिला.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकरी खते, बी- बियाणे खरेदीसाठी धडपडत आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी पुढे टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने आधीच खरेदीला प्राधान्य दिले. दरम्यान, शासनाने नवीन खतांची दरवाढ केली. जिल्ह्यात जुन्या खताचा साठा असतानाही अनेकांनी या नवीन खताची विक्री केली. नंतर शासनाने ही दरवाढ मागे घेतली. मात्र या शेतकऱ्यांना तर दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक गावांतून याबाबत तक्रारी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की, जर शेतकऱ्यांना ही रक्कम परत मिळाली नाही तर स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर अधीक्षक विजय लोखंडे यांनी कुठल्या तक्रारी आहेत, याबाबत विचारणा केली असता सेनगावच्या आढळल्या. त्यामुळे सेनगाव येथील कृषी कार्यालयाचे पथक पाठवून संबंधित शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यास भाग पाडू, असे सांगितले. तसेच सेनगावला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे व कार्यकर्त्यांनी सेनगावला जाण्याची तयारी सुरू केली होती.

यावेळी पतंगे यांनी आम्हाला कृषी अधीक्षकांनी साधे आतमध्ये येऊनही चर्चा करू दिली नाही. केवळ सेनगावला पाठवून हात झटकल्याचा आरोप केला आहे. तसेच विमा कंपनीनेही एनडीआरएफच्या निर्देशांनुसार विमा अदा केला नाही. त्यामुळे काहींना केवळ ८०० रुपये मिळाल्याचे सांगितले. याबाबतही प्रशासन काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.