शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रास्त भाव दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:15 IST

येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या अभिप्रायावर अंशत: कारवाई करून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मधला मार्ग स्वीकारत रास्त भाव दुकानदारांना अभय दिले आहे.आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही ई-पॉस मशिनचा वापर धान्य वाटपासाठी केला नाही. इतरही दिलेले आदेश पाळले नाहीत. आधार सीडींग केली नाही. ई-केवायसी केली नाही. या व अशा अनेक बाबी जाणीवपूर्वक टाळत असल्याने कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाचही दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे पाठविला होता. त्या पत्राच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी या पाचही दुकानदारांना नोटिसा बजावून २४ तासांच्या आत खुलासा करण्यास बजावले होते. त्यानुसार दुकानदारांनी आपले म्हणणे जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे मांडले होते. परंतु त्यांनी केलेले खुलासे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी अमान्य केले आहेत. दुकानदाराचे म्हणणे अमान्य करून त्यांच्यावर दुकान परवान्याची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर रास्तभाव दुकानदारांना सक्त ताकीद दिली असून कामासंदर्भात दिलेले वरिष्ठांचे आदेश मान्य करून एक महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण करावीत. ई-पॉस ट्रांजेक्शनमध्ये सुधारणा न झाल्यास परवाने निलंबितचा ईशारा देण्यात आला. ३ जानेवारी २०१९ रोजी सदर कारवाई करण्यात आली असून तसे पत्र दिले आहे. आखाडा बाळापूर येथील रास्तभाव दुकानदार ओमप्रकाश ठमके, सुमन पतंगे, विश्वनाथ पेंढारकर, नंदा शंकर सेवनकर, संतोष अग्रवाल आदींच्या नावे हे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कामात टाळाटाळ करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांना सूचित केलेले कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे धान्यवाटप करणे क्रमप्राप्त झाले आहे.मध्यम मार्ग स्वीकारत दुकानांवर कारवाई...तहसीलदारांनी रास्तभाव दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मात्र मध्यम मार्ग स्वीकारत ठेवलेले आरोप खरे ठरवत दुकानदारावर कारवाई केली. आणि दुसरीकडे रास्तभाव दुकानदार यांची बाजू सावरत त्यांचा बचावही केला. एक महिन्याची मुदत देऊन प्रकरण शांत केले. येत्या काही काळात रास्तभाव दुकानदारांचे काम सुधारले का नाही, हे कळणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMarketबाजार