शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जिल्हा रुग्णालयात औषधींसाठी रुग्णांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:24 AM

हिंगोली: सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यास पैसा लागत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु, तेथेही औषधी मिळत नसून ते बाहेरून ...

हिंगोली: सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यास पैसा लागत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु, तेथेही औषधी मिळत नसून ते बाहेरून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे सद्य:स्थितीत पहायला मिळत आहे.

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात संसर्ग, अस्थिरोग, नेत्ररोग, अपघात विभाग, प्रसूती विभाग, स्त्री वैद्यकीय चिकित्सा विभाग, पुरुष विभाग, इंजेक्शन विभाग, बालरोग, कान-नाक-घसा अशा सात-आठ ओपीडी आहेत. जिल्हा रुग्णालयात नाही म्हटले तरी तीनशे ते साडेतीनशे रोजची ओपीडी असते. महागडी औषधी बाहेर परवडत नाही, खासगी दवाखान्यात राहून रोगांवर इलाज करणेही शक्य होत नाही. काळजीपोटी रुग्णांसोबत त्याचे एक-दोन तरी नातेवाईक आलेले असतात. अशावेळी खासगी दवाखान्यात राहण्याची पंचाईत होते. ऑटोरिक्षाचा खर्च, लॉजचा खर्च हे तर डोकेदुखी होऊन बसते. म्हणून तर सर्वसामान्य नागरिक सरकारी दवाखान्यात रुग्णांना घेऊन जातात. परंतु, तेथेही बाहेरुन औषधी विकत आणावी लागत असेल तर सरकारी दवाखाना काय कामाचा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

१४ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फेरफटका मारला असता आणि रुग्णांशी विचारणा केली असता सत्यता बाहेर आली. रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

औषधी बाहेरुन आणणे परवडत नाही

सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे.

आपला दवाखाना म्हणून आम्ही रुग्णाला घेऊन येतो. परंतु, दवाखान्यात भरती होऊन दोन दिवस झाले की, तिसऱ्या दिवशी डॉक्टर येतात आणि औषधीची चिठ्ठी लिहून देतात. ‘बाहेरुन औषधी आणा’, असे म्हणून निघून जातात. मग अशावेळेस आम्ही काय करायचे? असा प्रश्नही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.

रुग्णाजवळ बसावे की औषधी आणावी?

रुग्ण आमचा गंभीर असतो. रुग्णाजवळ बसणे अगत्याचे असते. डॉक्टरांना हे माहितीसुद्धा असते. परंतु, ते औषधीची चिठ्ठी देवून मोकळे होतात. सकाळी राऊंडला येतात आणि दुपारच्यावेळी तपासणीला आल्यानंतर औषधीची चिठ्ठी हातात ठेवतात आणि सांगतात, आमच्याकडे औषधी नाही तुम्ही बाहेरुन मेडिकलवरुन औषधी आणा. अशावेळी नाईलाज असतो. रुग्णाला एकट्याला बसवून औषधी घेऊन येतो.

चिठ्ठी तपासणीची की औषधीची?

बहुतांशवेळा डॉक्टर आत आले की, चिठ्ठी तपासणीची आहे की, औषधीची हेही कळत नाही. राऊंडला ज्यावेळी डॉक्टर येतात तेव्हा ते सांगतात तुम्हाला चिठ्ठी दिली आहे. त्यावरील औषधी तुम्ही बाहेरच्या मेडिकलवरुन विकत आणा. इथे दवाखान्यात ती उपलब्ध नाही. मग आम्ही अशावेळी विचार करतो, रुग्णाचे बरेवाईट होण्यापेक्षा ती विकत आणलेली बरी, असे म्हणून औषधी विकत आणतो.

...तर त्यांच्यावर केली जाईल कार्यवाही

जिल्हा सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे. काही रुग्णांच्या तक्रारीही औषधी विकत आणावी लागत अशाच आहेत. जिल्हा सामाान्य रुग्णालयात सर्व औषधी मोफत उपलब्ध असतानाही बाहेरून का विकत आणावी लागत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे. जो कोणी माझ्याशी विचारपूस न करता परस्पर रुग्णाला औषधी लिहून देत असेल तर ते योग्यच नाही. यापुढे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. एवढेच नाहीतर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. रुग्णांची विचारपूस आणि त्यांना औषधी पुरविणे हे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामच आहे.-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली

फोटो आहे