शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 2:57 PM

शेतकरीही करु लागले पेन्शनची मागणी

- अरूण चव्हाणजवळा बाजार: संप केल्यावर मागणी मान्य होत असेल तर आमचा त्यास विरोध नाही. पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय घोडे मारले? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून आम्हालाही शासनाने १० हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी केली आहे.

शासकीय कर्मचारीवर्गाला जुनी पेन्शन लागू करावी व इतर मागण्यांसाठी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची शासकीय कामे खोळंबली आहेत. खरीप हंगाम अतिवृष्टीच्या पाण्यात गेला. रबी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव म्हणावा तसा मिळत नाही. तरीही शेतकरी आनंदी आहे. आता शेतकरी गप्प बसणार नाही. दोन पैसे कोणाला मिळत असतील तर आम्ही विरोध करणार नाहीत. पण शेतात राबून, उसनवारी करून पोट भरत नसेल तर शेतकरी आता शांत बसणार नाही. आम्हाला काय पैसे नको आहेत का? असा सवाल करून शेतकऱ्यांनी महिन्याकाठी दहा हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांची मुले शिकून मोठी होतात. त्यात आम्हाला आनंद आहे. पण आमचीही मुले शिकली पाहिजेत, असे वाटते. पण शेतकऱ्यांकडे पैसा नाही म्हणून मुले-मुली शेतातच राबतात. आता शेतकरी जागा झाला आहे. शासनाकडे पैसा आहे. तो पैसा कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असेल तर शेतकऱ्यांनाही द्यायला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.

शेतकरी जगला तर देश जगेल...सरकार सर्वांचे आहे. ते कोणावरही दुजाभाव करत नाही. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर आमचीही मागणी मान्य करावी.- दिलीप राखोंडे, शेतकरी

वेळ प्रत्येकावरच येत असते. शेतकरी तर उसनवारीत जीवन जगत आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्हाला पण पेन्शन द्यायला काहीच हरकत नाही.- माणिक सावंत, शेतकरी

शेतकऱ्यांना कधीच सुख मिळत नाही. सतत तो संकटाला सामोरे जात असतो. हंगाम संपला तरी काहीच पदरात पडत नाही. सरकारने शेतकऱ्यांनाही मानधन द्यावे.-सुरेश सुदाम चव्हाण, शेतकरी

शेतकरी भोळाभाबडा आहे. सकाळी उठून पिकाला पाणी देण्यासाठी जातो. साधी सायकल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर शेतकऱ्यांनाही दहा हजार रूपये मानधन द्या.- पाडुरंग मारोतराव शेळके, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनHingoliहिंगोली