शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा ! संतप्त नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:42 IST

शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.शहरातील अण्णा भाऊ साठे नगरातील महिला, पुरूष व युवक नगपालिकेत मंगळवारी मोठ्या संख्येने जमले होते. येथे उभारण्यात येणारा कत्तलखाना हा गैरकायदेशीर आहे. वसाहतीपासून पाच किमी अंतरावर कत्तलखाना असायला पाहिजे; परंतु तो आमच्याच वसाहतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू केला जात आहे. कत्तलखान्यामुळे येथील नागरिक व चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कत्तलखान्यातील सांडपाणी व टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शकतेनुसार करणे बंधनकारक असतानाही या नगरातील मागील पंचवीस वर्षांपासून बंद पडलेल्या जनावरांचा कत्तलखाना नागरिकांची संमती न घेताच सुरू केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरूष व युवक नगरपालिकेत जमले होते. यावेळी संतप्त महिलांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले नाही तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर प्रदीप खंदारे, जय घोडे, अक्षय डाखोरे, कैलास शिखरे, दिगंबर हानवते, उत्तम चांदणे, अनिल खडसे, नितीन गालफाडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.दरम्यान, या नागरिकांनी साईटवरही काम थांबविण्यासाठी दबाव आणला होता.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा