शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

...तर मद्य विक्रेत्यांवर कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:42 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, अशी तीन दिवस दारूविक्री करता येणार नाही.त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश आहेत.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदान व मतमोजणीच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही, तसेच अनुचित प्रकार घडू नये, याबाबत खबरदारी घेत मुंबई मद्य निषेध कायदा, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर १६ एप्रिल रोजी (सायंकाळी ५.३० नंतर), दिनांक १७, १८ एप्रिल २०१९ व २३ मे रोजी संपूर्ण दिवस संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. निवडणूक काळात मद्यविक्रीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केले जाणार आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू केल्यानंतरही अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेत मद्याची विक्री करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करून अनेकांना अटक केली. निवडणुकीच्या काळात मद्याचा अतिरिक्त साठा केला जाऊ नये, याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि मतदानाच्या दिवशी मद्य विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध धडक मोहीम राबवून करडी नजर ठेवली जाणार आहे.जिल्ह्यात ३९ परवानाधारक देशी दारूची दुकाने आहेत. तर ९१ बार असून ४ वाईन शॉप आहेत. तसेच बियरशॉपींची ४० च्या वर संख्या आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. शिवाय याबाबत संबधित दुकाचालकांना कळविण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान आदर्श आचार संहितेत अवैधरित्या दारू विक्री करणाºयांवर पथकाकडून धडक कारवायाही करण्यात आल्या. संबधित आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून दारूसाठा जप्त केला. तर रसायनही नष्ट करण्यात आले.दुसºया टप्यात हिंगोली लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक निर्भपणे व मुक्त वातावरणात पार पडावी यासाठी मद्य विक्रीस मनाई करण्यात येते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकाने बंदचे आदेश आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस