शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

यंदा पीकविम्याने तारले; भरले ९५ कोटी, मिळणार १०५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:28 AM

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. ...

हिंगोली जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात काढणीत असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचा उताराही चांगला आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची आस होती. शासनानेही अतिवृष्टीग्रस्तांना मदत घोषित केली होती. यंदा पीकविम्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व कृषी विभागही आग्रही होता. शेतकऱ्यांच्या बाजूने ही सर्व मंडळी उभी राहिल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर पीक कापणीचे वस्तूनिष्ठ प्रयोगही करण्यात आले. त्यात आढळून आलेल्या परिस्थितीमुळे विमा कंपनीला १.२१ लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा लागला. मागील अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन या तिघांनी मिळून भरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळाली आहे. एचडीएफसी कंपनीकडे हिंगोली जिल्ह्याच्या पीकविम्याची जबाबदारी होती. मागील काही दिवसांपासून टप्प्या टप्प्याने पीकविमा जमा होत असून आतापर्यंत ६५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. उर्वरित रक्कमेसाठी प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाकडून त्याचा आढावा घेतला जात आहे.

एकूण मंजूर पीकविमा १०५.१९ कोटी

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम १३.१८ कोटी

राज्य सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी

केंद्र सरकारने भरलेली रक्कम ४०.६० कोटी,

विमा काढणारे शेतकरी ३.०२ लाख

लाभार्थी शेतकरी १.२१ लाख

किती जणांना मिळाला विमा ७० हजार

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ६५ कोटी

खरीप हंगाम २०२०-२१

पीकविमा लागवड क्षेत्र

१,४७,००० हेक्टर

एकूण पीकाचे क्षेत्र

३,४०.००० हेक्टर

बहुतांश शेतकऱ्यांना लाभ

पीकविम्याचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला आहे अथवा मिळत आहे. यातून सुटलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत खुप कमी आहे. पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख दिसत असली तरीही अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन पिकांचा विमा भरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संख्या वाढली आहे. यातील काही पिकांना फटका बसला नाही, त्यामुळे विम्याचाही प्रश्न उरला नाही. तरीही यंदा अनेक शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाल्याने त्या प्रमाणात तक्रारी दिसत नाहीत. शिवाय अजूनही विमा मंजूर होणे चालू असून शेतकऱ्यांचा खात्यावर रक्कम जमा होणे चालू आहे. याबाबत मात्र अनेक शेतकऱ्यांची नाराजी आहे. विम्याची रक्कम मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर बियाणे खरेदी करता येईल

पीकविमा गावातील बहुतांश शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. जर शेतकऱ्यांना ही रक्कम पेरणीपूर्वी मिळाली तर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यातच आतापर्यंत केवळ ६५ कोटी रुपये खात्यावर जमा झालेले आहेत. आणखी ४० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली त्यांनाही ती बँकेतून काढण्यास अडचणी येत आहेत.