शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:34 AM

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला ...

हिंगोली : जिल्ह्यात २० ते २२ दिवसांनंतर रविवारी पावसाचा शिडकावा झाला. या पावसाने थोडासा ओलावा निर्माण झाला असला तरी अजूनही पिके तगतील असा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ढगाकडे डोळे लावून बसले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी अद्याप एकदाही सर्वदूर पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पाऊस ठिकाण बदलून बरसत होता. एका तालुक्यात पाऊस तर दुसऱ्या तालुक्यात कोरेडे हवामान पहावयास मिळत होते. ठिकाण बदलून पाऊस होत असला तरी पिके जोमात बहरली होती. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच पावसाने जुलैच्या मध्यापासून पाठ फिरविली. शेंगा लागण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी फुले गळून जात आहेत. पावसाची अशीच स्थिती राहिली तर बियाणाचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. रविवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत आहे. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अद्याप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाणी साठवण प्रकल्पातही पाण्याची आवक वाढली नाही. साठवण प्रकल्पही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तलावांना पावसाची प्रतीक्षाच

हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, सवड, चोरजवळा, हिरडी, पेडगाव, हातगाव, सेनगाव तालुक्यातील सवना, पिंपरी, घोरदरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील वाळकी, औंढा, पूरजळ, वंजारवाडी, पिंपळदरी, सेंदूरसना, काकडधाबा, केळी व कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, बोथी, दांडेगाव, देवधरी, तर वसमत तालुक्यातील राजवाडी तलावांना पावसाची प्रतीक्षा आहे.

जवळपास एक महिना होत आहे. आमच्या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. हा भाग माळरानाचा असल्याने पा्ऊस असेल तरच पिके येतात. आता पिके अखेरची घटका मोजत आहेत.

-आंबाजी इंगोले, शेतकरी

पेरणीनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. सध्या पाऊस नसल्याने फुले गळून पडत आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उत्पादनात घट होऊन पेरणीचा खर्चही निघणार नाही.

-शंकर औटे, शेतकरी

पेरणी वाया

जाण्याची शक्यता

सोयाबीन -२५६५८१

कापूस ३०७२२

तूर -४०८२८

मूग- ७९५३

उडीद -५६४३

ज्वारी - ४५२९

(आकडे हेक्टर्समध्ये)