शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा जवळच्या महाविद्यालयांकडेच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:20 AM

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला ...

हिंगोली : अकरावी, बारावीसाठी पैकीच्या पैकी मिळणारे अंतर्गत मूल्यमापणाचे गुण लक्षात घेता गावाजवळच्या महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गतवर्षी जवळच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर्षी दहावीचा निकाल उंचावला असून विद्यार्थी आतापासूनच प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.

ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी नांदेड, औरंगाबादसारख्या शहरात शिक्षणासाठी जात होते. त्यामुळे विद्यार्थी मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील संस्थाचालक, प्राचार्य आटापिटा करीत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरी महाविद्यालयात प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील महाविद्यालयेदेखील विद्यार्थ्यांनी गजबजत आहेत. गतवर्षी दहावीचा ९१,९४ टक्के निकाल लागला होता. तरीही ग्रामीण भागातील महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी, पालकांची चांगलीच धावपळ झाली होती. या वर्षी तर दहावीचा निकाल उंचावला असून निकाल ९९.२५ टक्के लागला आहे. तब्बल १६ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असले तरी काही विद्यार्थी, पालक आतापासूनच जवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

अकरावी, बारावीला ३० गुण अंतर्गत मूल्यमापनाला दिले जातात. ग्रामीण भागातील महाविद्यालयात जास्तीत जास्त गुण दिले जातात. तसेच काही विद्यार्थी अकरावीपासूनच बारावी व साईटीच्या अभ्यासाला लागतात. एकदा ग्रामीण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शहरी भागात क्लासेस लावण्यावरही काही पालकांचा भर असतो. त्यामुळेही अकरावीला ग्रामीण भागात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळाल्या नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. सध्या प्रवेशासंदर्भात काही सांगता येणार नाही.

- डी. बी. जोशी, प्राचार्य, बाराशीव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय, बाराशीव

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे टी. सी. उपलब्ध होण्यास वेळ लागेल. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी विचारणा करीत आहेत. त्यांच्याकडून आधार कार्ड व प्रवेश फार्म भरून घेतला जात असून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे.

- गोविंद वाघ, प्राचार्य, गोकुळनाथ क. महाविद्यालय, आडगाव रंज

अकरावीसाठी हवा असलेला अभ्यासक्रम ग्रामीण भागातही उपलब्ध झाला आहे. शिवाय महाविद्यालय गावाजवळ असल्याने खर्चात बचत होते. तसेच ओखळीचे प्राध्यापक असल्याने अभ्यासाविषयी अडचण येत नाही.

-ऋषिकेश खराटे

ग्रामीण भागातही विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून क्लासेसही घेतले जातात. घर जवळ असल्याने अनावश्यक खर्च वाचतो. त्यामुळे शहरात प्रवेश न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेतला.

-गणेश खराटे

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ११२

एकूण जागा - २०३६०

गेल्या वर्षी किती जणांनी प्रवेश घेतला - १८२५५

किती जागा रिक्त राहिल्या - २१०५