शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा

By रमेश वाबळे | Updated: October 4, 2023 16:19 IST

पाच दिवसानंतर हळद मार्केट यार्ड सुरू

हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यवहार मागील पाच दिवसांच्या बंदनंतर ३ ऑक्टोबरपासून सुरू झाले. या दिवशी १ हजार ८०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. आवक वाढल्यामुळे मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.

यंदा हळदीला ऑगस्टमध्ये मागील तेरा वर्षातील उच्चांकी दर मिळाला. सरासरी १५ ते १७ हजार रूपये क्विंटलने हळद विक्री झाली. आणखी दर वधारतील किंवा स्थिर तरी राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भावात घसरण सुरू झाली. जुलै, ऑगस्टच्या तुलनेत आवक कमी होत असली तरी भावात घसरण होत गेल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यातच २८ सप्टेंबर गणेश विसर्जनापासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी आवक १ हजार ८०० क्विंटल झाली होती. या दिवशी भाव समाधानकारक मिळेल अशी आशा होती. परंतु, किमान १० हजार ८०० ते १२ हजार ८५० रूपये दर मिळाला. ऑगस्टच्या तुलनेत तब्बल तीन ते चार हजारांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.

मूगाला मिळाला सरासरी ११ हजार ६०० चा भाव...येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मंगळवारी २० क्विंटल मूगाची आवक झाली होती. किमान १० हजार ३०० ते कमाल १३ हजार रूपये भाव मिळाला. यंदा मूगाला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनची आवक वाढली...भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील आठ ते नऊ महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले. आता आठवड्यापासून बाजारात नवे सोयाबीन आले आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. ३ ऑक्टोबरला ८०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. नवे सोयाबीन आले तरी भाव मात्र पडतेच आहेत. त्यामुळे यंदाही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. जुने आणि नवे एकाच भावात जात असल्यामुळे इतक्या दिवस सोयाबीन विक्रीविना ठेवून काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली