शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

By रमेश वाबळे | Updated: September 1, 2024 22:27 IST

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रमेश वाबळे, हिंगोली :  जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता. या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जडगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्याने वाचविला. पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जडगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला.  गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. शेतशिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती. यात जडगाव येथील शेतकरी लव्हेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते. बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी लव्हेकर पुराच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी बैलांची सुटका केली. त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते. त्यामुळे प्रवीण लव्हेकर आणि सोपान लव्हेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली; परंतु तिघेही पुरात अडकले, तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते. जीव वाचविण्यासाठी तिघाही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला होता;  परंतु पुराचे पाणी कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदारांशी संपर्क केला असता एनडीआरएफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीविताला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत होते. तेव्हा जडगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेतली. झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले. त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले. शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘एनडीआरएफ’ पथक येणार म्हणताच आनंद मायेना....

पुराचे पाणी वरचेवर वाढत होते. त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय, अशी भीती वाटू लागली होती. परंतु ‘एनडीआरएफ’ पथक नांदेडवरुन येणार असे गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला.  परंतु पथकही येईना आणि कोणीच धावून जाईना म्हणून जडगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिंमत दाखवून दोरीच्या साह्याने उडी घेतली.  त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचे पाण्यात आडकलेल्या नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली