शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली; ट्रॅव्हल्सची भाडेवाढ मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:33 AM

हिंगोली : अनलॉक झाल्यामुळे आणि राखी पौर्णिमा सणामुळे ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली आहे. ट्रॅव्हल्सचे दर सध्या तरी वाढले ...

हिंगोली : अनलॉक झाल्यामुळे आणि राखी पौर्णिमा सणामुळे ट्रॅव्हल्सलाही प्रवासी संख्या वाढू लागली आहे. ट्रॅव्हल्सचे दर सध्या तरी वाढले नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या आधी हिंगोली ते पुणे ८०० रुपये भाडे होते. सध्या हे भाडे ६०० रुपये एवढे आहे. हिंगोली ते नागपूर ६०० रुपये भाडे होते. आता हे भाडे ५५० रुपये करण्यात आले आहे. कोरोना महामारी कमी झाली असली तरी एक-दोन रुग्ण आढळून येत असल्यामुळे लोक प्रवास करण्याचे टाळत आहेत. दोन दिवसांवर राखी पौर्णिमा सण असल्यामुळे आणि ट्रॅव्हल्सचा प्रवास सुखकर असल्यामुळे भावाला ओवाळण्यासाठी बहिणी माहेरी जात असल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे सध्यातरी इतर राज्यात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स सुरू नाहीत. शासनाने परवानगी दिल्यास इतर राज्यात ट्रॅव्हल्स सुरू केल्या जातील.

मार्ग आधीचे भाडे आताचे भाडे

हिंगोली ते पुणे ८०० ६००

हिंगोली ते नागपूर ६०० ५५०

लॉकडाऊनपेक्षा बऱ्यापैकी प्रवासी ...

कोरोनाकाळात ट्रॅव्हल्स फेऱ्या बंदच होत्या. आजमितीस कोरोना कमी झाल्यामुळे अनलॉक करण्यात आले आहे. आता कुठे प्रवासी संख्या वाढू लागली आहे. इतर राज्यांत गाड्या कधी सुरु होणार आहेत ? याची विचारणा प्रवासी करीत आहेत. परंतु, शासनाची परवानगी नसल्यामुळे त्या सध्या सुरू करता येत नाहीत, असे सांगावे लागत आहेत. राखी पौर्णिमा हा सण असल्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना प्रवासी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करीत आहेत.

डिझेलचे दर वाढले आहेत...

गत काही महिन्यांपासून डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे नाईलाजाने काही ठिकाणी तिकिटात वाढ करावी लागत आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर, हैदराबाद या ठिकाणच्या ट्रॅव्हल्स बंद आहेत. शासनाने परवानगी दिल्यास जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील ट्रॅव्हल्स सुरू केल्या जातील. डिझेलचे दर वाढले असतानाही प्रवाशांच्या सोयीसाठी काही ठिकाणी तिकिटाचे दर कमीही केले आहेत.

-जगजीतराज खुराणा, हिंगोली