शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सदस्यत्व रद्द करा; न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:23 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांवर राखीव जागांवर निवडून आलेल्या मात्र ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. वसमत तालुक्यात मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांची संख्या मोठी आहे. वसमतचे नगराध्यक्षांसह ६ न. प. सदस्य, ४ जि.प. तर ७ पं.स.सदस्य अपात्रतेच्या ‘पात्रतेत’ बसणारे आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची वाट विरोधक पाहत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: स्थानिक स्वराज्य संस्थांवर राखीव जागांवर निवडून आलेल्या मात्र ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. वसमत तालुक्यात मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांची संख्या मोठी आहे. वसमतचे नगराध्यक्षांसह ६ न. प. सदस्य, ४ जि.प. तर ७ पं.स.सदस्य अपात्रतेच्या ‘पात्रतेत’ बसणारे आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची वाट विरोधक पाहत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवताना राखीव जागांवर अर्ज भरणाºया उमदेवारांनी शपत्रपत्र दिलेले आहे. यात ६ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे नमूद आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ज्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांचे पद सहा महिने संपताच रद्द होणार आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांवर कोणी लक्ष दिले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने मुदतीची मुदत न पाळणाºया सदस्यांवर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने माहिती मागवली आहे.वसमत नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार यांच्या जात प्रमाणपत्रावर बरेच वादविवाद झाले होते. अखेर जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्यामुळे त्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र त्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आठ महिने दोन दिवस एवढा उशीर झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच बरोबर वसमत न.प.चे राष्टÑवादीचे २ सदस्य, काँग्रेसच्या १ सदस्य, शिवसेनेचे २ सदस्य यांचेही जात प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जि. प.च्या ६ सदस्यांनी राखीव गटातून निवडणूक लढवली होती.त्यापैकी हयातनगर व बाभूळगाव गटाच्या सदस्यांनीच उमेदवारी अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्र सादर केले होते. तर आंबा, करंजाळा गटाच्या सदस्यांचे अद्यापही प्रमाणपत्र सादर नाही.गिरगाव व आसेगावच्या सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र २८ आॅगस्ट २०१८ रोजी सादर केले आहे ते मुदतीनंतरच जि.प.चे ४ सदस्यही अपात्रतेच्या वाटेवर आहेत.पं.स. : हौशागौशांना पोटनिवडणुकीचे डोहाळेपंचायत समितीच्या धामणगाव, हट्टा व बाभूळगाव या चार गणाच्या सदस्यांचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर आहे. उर्वरित पार्डी खु., आंबा, टेंभूर्णी, करंजाळा, आडगाव, खांडेगाव, हयातनगर या ७ गणांतील सदस्यांचे प्रमाणपत्र सादरच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार यात शंका नाही. आता मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांवर कारवाई होणार की कसे हे ठरणार असले तरी संबंधित सदस्यांच्या विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही अतिउत्साही तर पोट निवडणुकीच्या तयारीत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकCourtन्यायालय