शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

वाहनांना प्रवासी मिळेना, हप्ते फिटेनात, उपसमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:29 AM

हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत ...

हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत नसल्याने भाडे नाही, अनेक मालकांनी चालक काढून टाकल्याने उपासमार आली. तर काहींचे हप्ते थकल्याने वाहन फायनान्सवाल्यांनी ओढून नेले. उपासमारीत दिवस काढण्याची वेळ आली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जमापुंजी गमावल्यानंतर नेमकेच सावरत असताना दुसरी लाट आली. या लाटेने खाजगी वाहनानेही लोक प्रवास टाळत आहेत. त्यातच ज्यांना निकडीचे काम आहे, त्यांना ई पास मिळत नसल्याने तसा प्रवास करायचा तर नफ्यापेक्षा जास्त दंडच भरावा लागत असल्याने कोणी तसे वाहन न्यायला तयार नाही. तरीही रोज प्रवासी मिळतील या प्रतीक्षेत जि.प.जवळ पार्किंग करून ग्राहकाची प्रतीक्षा करीत शेकडो वाहने उभी राहात आहेत. त्यातही एक ते दोन लिटर डिझेल, पेट्रोल वाया जात आहे. शिवाय ज्यांचे हप्ते थकले अशांना एकतर रोज फायनान्स कंपनीचे बोलणे ऐकावे लागत असून काहींची वाहने ओढून नेली. वरून बाहेर पडल्यावर चहापान्यालाही रक्कम खिशात नसल्याने कुणी ओळखीचे भेटले तर खाली पाहण्याची वेळ येत आहे. काही वाहनचालकांचे पोटच या कामावर असल्याने अशांना वर्गणी करून माल भरून दिल्याचे सांगताना एका वाहनचालकास गहिवरून आले होते. विशेष म्हणजे आम्ही दुर्लक्षित घटक असल्याने कोणतीच मदत आम्हाला मिळाली नाही. हात पसरायची ईच्छाही नाही. मात्र तपासणी करून निकडीच्या काळात ईपासद्वारे लोकांना प्रवास करायला मुभा दिली तरीही आम्ही आमचे जीवन जगू शकू, असे स्वाभिमानाचे बोलही एका चालकाने बोलून दाखविले. त्यातच वाहन बंद पडले तर दुरुस्तीची अडचण होत असल्याचेही सांगण्यात आले.

वाहनेही बंद, गॅरेजलाही दुरुस्ती येईना

एकतर वाहने बंदच असल्याने त्यांची दुरुस्ती निघत नाही. जर दुरुस्ती निघालीच तर सुटे भाग मिळण्यासाठी दुकाने सकाळीच एक दिवसाआड सुरू राहात असल्याने तोपर्यंत वाहन तसेच ठेवावे लागत आहे. यामुळे अनेकांची गॅरेजचालकावर नाराजी येत आहे.

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

ज्यांचे स्वत:चे वाहन नाही. दुसऱ्याच्या वाहनावर आहेत. अशा अनेकांचा रोजगार गेला. दुसरे कामही मिळत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे, असे वाहनचालक संघटनेचे संतोष डुकरे म्हणाले. शिवाय ज्यांना मालकांनी अजूनही कायम ठेवले त्यांना ग्राहकच नसल्याने पगार कसे द्यायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

वाहने पार्किंगमध्येच

मागील दोन महिन्यांपासून वाहनाला एकदाही भाडे लागले नाही. पार्किंगमध्ये वाहन उभे करून परत नेण्यात डिझेल वाया जात आहे. ई पास मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

-ज्ञानेश्वर गिरी

मागील तीस वर्षांत पहिल्यांदाच चहालाही महाग होण्याची वेळ आली. जीवनाच्या या टप्प्यावर वेगळे कामही करू शकत नाही. कुणाची मदत मिळणार नाही. मात्र ई पास दिली तर आम्ही जगणे तरी सुकर होईल.

-प्रदीप जयस्वाल

आम्हाला वाहन दुरुस्तीची मुभा दिली. मात्र दुकाने बंद राहात असल्याने पार्ट मिळत नाहीत. काही पार्ट वाहतुकीमुळे मिळत नाहीत. तर त्या तुलनेत वाहनेही दुरुस्तीला येत नाहीत.

-तस्लिम पठाण गफ्फार खान पठाण

चारचाकी वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी पूर्वी वेटिंग असायची. आता आम्हालाच एखादे वाहन येते का याची वाट पहावी लागते. त्यातही सुटे भाग मिळत नसल्याने एकाच दुरुस्तीत दोन तीन दिवस जात आहेत.

-इद्रीस खान

कार ९५००

जीप १८००

दुचाकी १५००००

टॅक्सी/ रिक्षा ४५००

ट्रक/ट्रॅक्टर १४०००

रुग्णवाहिका ५६

शहरात वाहने किती १,९५,००००