शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गाव विकणे आहे ! जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 11:32 IST

कर्ज माफ करण्यासाठी आंदोलकांनी प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी दिला आहे.

सेनगाव (जि. हिंगोली) : तालुक्यातील ताकतोडा व हाताळा येथील गावकऱ्यांनी सुरू केलेले गाव विक्री आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रशासनाला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आंदोलकांनी आठ दिवसांचा कालावधी दिला आहे.

ताकतोडा येथील ग्रामस्थांनी पिक विमा, सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करा या प्रमुख मागण्यांसाठी २४ जुलैपासून गाव विक्री आंदोलन पुकारले होते. ग्रामस्थांनी शाळा बंदी करीत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून ती मंदिरात भरविली. ग्रा.प.कार्यालय कुलपबंद ठेवले. त्यानंतर १४ युवक शेतकऱ्यांनी बुमुदत उपोषण केले. शिवाय गावातील काही ग्रामस्थांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. २६ जुलै रोजी ग्रामस्थांनी एक दिवस अन्नत्याग केला. 

अखेर शुक्रवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवनकुमार कांबळे, तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकर आदींनी ताकतोडा येथे जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली व आठ दिवसांत दीड लाख रुपये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल. शिवाय या शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यासाठी गावात बँकेच्या माध्यमातून मेळावा घेऊन नवीन पीककर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले. सरसकट कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी कालावधी लागणार असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केली. त्यानंतर आठ दिवसांची मुदत देऊन हे आंदोलन सायंकाळी चार वाजता मागे घेण्यात आले.

हे सरकार आहे की कुंभकर्ण?हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी आंदोलनाची दखल घ्यायला भाजप-शिवसेनेच्या सरकारला आठ-आठ दिवस का लागतात? हे सरकार आहे की कुंभकर्ण? असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीFarmerशेतकरीagitationआंदोलन