शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

कयाधू नदीवर पूल उभारणीसाठी गावकऱ्यांचे नदीपात्रात उतरून आंदोलन

By विजय पाटील | Updated: October 3, 2023 18:09 IST

कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील कोंढूर ते डिग्रस येथून जाणाऱ्या कयाधू नदीवर पूल बांधावा, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबर रोजी कयाधू नदीच्या पाण्यात उतरून दोन तास आंदोलन केले.

कयाधू नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे कयाधू नदीच्या पलीकडे कोंढूर ते डिग्रस गावांतील शेतकऱ्यांची पाचशे ते सहाशे हेक्टर जमीन आहे. सदरील जमीन विहितीसाठी फेरा मारून जावे लागत आहे. नदीवर पूल बांधावा, यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु या आंदोलनाला अद्यापपर्यंतही यश आले नाही. कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

कयाधू नदीवर पूल झाल्यास दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. कळमनुरी व आखाडा बाळापूरला जाण्या-येण्यासाठी फेरा मारून जावे लागत आहे. या आंदोलनात कोंढूर ,डिग्रस, गोरलेगाव, सिंदगी, येहळेगाव (गवळी), असोला, कसबे धावंडा आदी गावांनी पाठिंबा दिला. शेतकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कयाधू नदीपात्रात उतरून दोन तास आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन मंडळअधिकारी तेलेवार यांना देण्यात आले. यावेळी विनोद बांगर, विठ्ठल देशमुख, विद्याधर मगर, राजू पतंगे, मारोती पतंगे, ज्ञानेश्वर पतंगे, सुधाकर पतंगे, काशिराव पतंगे, विठ्ठल पतंगे, उत्तमराव पतंगे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी