शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:39 IST

तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.पावसाळा संपत आला तरीही ५५ ते ६० टक्केच सरासरी पाऊस पडला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४३१.९६ मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २७०.८३ दलघमी एवढा आहे. जुलै महिन्यात नांदेडसाठी १.७३९१ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. या धरणातून विदर्भातील ४० कळमनुरी तालुक्यातील २५ गावांना व कळमनुरी शहर अशा एकूण ६६ गावांना या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. उन्हाळी हंगामातच पिकांसाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. जून महिन्यांपासून हे दोन्ही कालवे बंद आहेत. कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत ५२३.९ मि.मी.च पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ७२ टक्के धरण रिकामेच आहे. कडक ऊन व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने आटते. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरण काही भरत नाही. ८ महिन्यात धरणातील साठा कमी होईल, असे वर्तविण्यात येत आहे. धरणातून दरवर्षी पिके व पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. पाऊस नसल्याने धरण काही भरत नाही. धरणात येणारी पाण्याची आवक कमीच होत चालली आहे.

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोली