शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

संविधानविरोधी काम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल : चंद्रशेखर आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 20:06 IST

भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे.

हिंगोली : भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे. परंतु, भीमआर्मी हे कदापि खपवून घेणार नाही. तसेच देशात संविधानाविरूद्ध कोणी काम करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा भीमआर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.  

हिंगोली मार्गे अमरावतीकडे जाताना भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी येथे धावती भेट दिली. शहरात त्यांचे आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आझाद म्हणाले, भीमआर्मी शोषित व पिडितांवर होणाऱ्या अन्याविरूद्ध लढा देत आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. भीमआर्मीच्या वाढत्या ताकदीमुळे भाजप सरकाने धसका घेतला आहे. यामुळेच पोलिसांच्या नजरकैदेत ठेवणे, सभेवर बंदी आणणे असे संविधान विरोधी कृत्य सरकार करत आहे. तसेच भीमाकोरेगाव दंगलीतील आरोपी आजही मोकाट फिरत असून सरकार मुग गिळून गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. 

भीमआर्मी सामाजिक संघटनआगामी निवडणूक संदर्भात आझाद यांनी स्पष्ट मत व्यक्त केले नाही. मात्र,  भीमआर्मी हे एक सामाजिक संघटन आहे असे ते म्हणाले. तसेच ‘जो बहुजनो की बात करेगा वही दिल्ली पे राज करेगा’ असे उत्तर त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना दिले. यावेळी भीमआर्मीचे दीपक भालेराव, राहूल पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मीGovernmentसरकारBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार