शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:22 IST

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.वाई गोरखनाथ येथील यूवक नागराज खंदारे (२८) याचा मृतदेह चोंडी रेल्वेस्टेशन येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात सापडला होता. मयत हा मिस्त्री काम करतो. त्याला मटका लागला होता. त्यामुळे मटका एजन्टकडे पैसे मागण्यासाठी तो गेला असता मटका एजन्ट व मयत नागराज खंदारे यांच्यामध्ये वाद झाला. मटक्याची उधारी देण्यावरुन झालेल्या वादानंतर पाच जणांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्यात मयत नागराज खंदारे हा जागीच मरण पावला आहे. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली होती. सकाळी १ नोव्हेंबर रोजी मयताचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही संशयीतांना पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर घटनेमुळे मागील काही दिवसांपासून परिसरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. अखेर याप्रकरणी पाचव्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बाबाराव खंदारे यांच्या फिर्यादीवरुन करुंदा पोलीस ठाण्यात आरोपी राहुल सरोदे, अशोक सरोदे, संदीप मोरे, सुमित सरोदे, राहुल मगरे (सर्व रा. चोंढी रेल्वेस्टेशन) या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०२, २०१,१०९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. मटक्याचा जुगार लागला होता त्यातून या मयताचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिराने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अजून फरारच आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.४७ वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूलहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ९ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. त्या अनुषंगाने मंगळवारी ही कारवाई केली.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी