शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM

२०११ मध्ये जनगणना झाली होती. त्या जनगणेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर ...

२०११ मध्ये जनगणना झाली होती. त्या जनगणेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. त्यानंतर जवळपास १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे. आजमितीस लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे एक पोलीस आहे, अशी परिस्थिती येते. अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने हे सर्व सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. एकंदर पोलीस भरती संदर्भात नवीन ‘जीआर’ निघेल आणि पोलीस भरतीचे स्वप्न साकार होईल, अशी आशा तरुणांना आहे.

जिल्ह्यात १२३५ लोकांमागे एक पोलीस

हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी आहे. पोलिसांची संख्या जिल्ह्यात १ हजार १०० जवळपास आहे. लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे एक पोलीस असा येऊ शकतो. हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या कमी आहे. अजून हिंगोली जिल्ह्याला पोलीस विभागात मनुष्य बळाची गरज आहे.

गत दोन वर्षांपासून आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी मी सराव करीत आहे. मैदानावर सकाळ आणि सायंक़ाळी रोज जात असतो. गोळाफेक, धावणे, लांब उडी, तसेच पोलीस भरती संदर्भातील पुस्तकांचेही वाचन केले आहे. परंतु, अचानक जीआर रद्द झाल्याने नाराजी आहे.

- ओम जगताप,

इसापूर, ता. हिंगोली

पोलीस विभागात भरती होऊन देशसेवा करण्याची माझी लहानपणापासून मनोमन इच्छा आहे. यासाठी मी दोन वर्षांपूर्वी गाव सोडले आहे. हिंगोली शहरात दोन हजार रुपये किराया असलेल्या खोलीत राहतो. माझी परिस्थितीही हलाकीची आहे.

‘जीआर’ रद्द झाल्याने माझा हिरमोड झाला आहे.

- रवी घुगे,

सेलसुरा, ता. कळमनुरी

शासनाने पोलीस भरती होणार हा जीआर काढल्यानंतर खूप आनंद वाटला. मेहनतीला फळ मिळेल असेही वाटले होते. परंतु, अचानक शासनाने जीआर ऱद्द केल्याने थोडी नाराजी आहे. शासन पोलीस भरतीचा जीआर नव्याने काढले जाईल, अशी आशाही आहे.

- हरीष पुंडगे, शाहूनगर, ता. हिंगोली