शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:53 IST

अनेकदा आपण मैत्रीच्या कहाणी ऐकतो, तशीच ही गोष्ट आहे ३ मित्रांची, ज्यांनी मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत. 

नवी दिल्ली - "ये दोस्ती हम नही तोडेंगे.." फिल्म शोले सिनेमातील हे प्रसिद्ध गाणं तुम्ही ऐकलं असेलच. मैत्रीच्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा ३ मित्रांची गोष्ट सांगणार आहोत, जे तिघेही एकत्र शिकले, एकत्र अभ्यास केला आणि तिघेही आज प्रशासकीय सेवेत रुजू झालेत. या तिघांपैकी २ IAS तर १ जण IPS अधिकारी बनला आहे. 

ही कहाणी आहे आयपीएस साद मिया खान, आयएएस विशाल मिश्रा आणि गौरव विजयराम यांची. ३ वर्षापूर्वी २०१७ मध्ये या तिघांनी सर्वात कठीण असलेली यूपीएससीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तिघेही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. साद मिया खान उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहे. विशाल मिश्रासोबत त्यांची भेट हरकोटच्या टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीत बीटेक करताना झाली. या दोघांनी एमटेकसाठी आयआयटी कानपूर येथे प्रवेश घेतला. तेव्हा सादने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 

एमटेकनंतर यूपीएससी तयारीसाठी साद खानसोबत विशाल मिश्राने दिल्ली गाठली. त्याठिकाणी या दोघांची भेट गौरव विजयराम यांच्याशी झाली. त्यानंतर हे तिघे जिगरी दोस्त बनले. त्यानंतर तिघांनी आपापली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. साद खाननं यूपीएससी परीक्षा २०१३ मध्ये दिली. मात्र पहिलं यश २०१७ मध्ये मिळालं. साद खान यांचा हा पाचवा प्रयत्न होता. साद यांनी ऑल इंडियामध्ये २५ वी रँक मिळवली परंतु आयएएसऐवजी आयपीएससाठी त्यांची निवड झाली. 

गौरव विजयराम यांनीही २०१७ मध्ये चौथ्यांदा यूपीएससी दिली, त्यांना देशात ३४ वा क्रमांक लागला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, सुरुवातीच्या प्रयत्नात मी मुख्य परीक्षेसाठी तयारी केली नव्हती. त्यानंतरच्या प्रयत्नात जनरल स्टडीज पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले नव्हते असं त्यांनी सांगितले. तर आयएएस विशाल मिश्रा उत्तराखंडचे रहिवासी आहेत. आयआयटी कानपूर इथं प्रवेश घेतल्यानंतर साद खान यांच्यासोबत एमटेक केले. त्यानंतर यूपीएससी तयारी करणाऱ्या विशाल मिश्रा यांनाही २०१७ मध्ये यश मिळालं. ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांचा ४९ वा क्रमांक होता. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी