शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्ज घेऊन UPSC ची तयारी, शिक्षणासाठी शेकडो किमी पायपीट; संघर्षातून बनले IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:33 IST

वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती.

कुटुंबाची परिस्थिती हालाखीची, परंतु काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी होती. शिक्षणासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली. एकवेळ अशी आली की शिक्षणासाठी कर्ज घ्यावं लागलं. ही कहाणी आहे वीर नावाच्या युवकाची. ज्याने संघर्षातून वाट काढून यशाकडे झेप घेतली आहे. "मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है, पंख से कुछ नही होता, हौसलो से उडान होती है" ही हिंदीतील म्हणं या युवकाच्या आयुष्यात चपखल बसते. 

उत्तर प्रदेशातील छोट्या गावात दलपतपूर येथे राहणाऱ्या वीर प्रताप सिंह राघवनं यशाचं शिखर गाठलं. अनेक अडचणी, समस्यांचा डोंगर पार करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले. वीरची यूपीएससीची कहाणी अनेक स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रेरणादायी आहे. UPSC परीक्षेत वीर प्रताप सिंहनं ९२ वा क्रमांक पटकावला. सुरुवातीला आर्य समाज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ६ वी ते १० वीपर्यंत शिकारपूरच्या सरस्वती विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत जाण्यासाठी घरापासून ५ किलोमीटर अंतर होतं. त्यावेळी गावात पूल नव्हता, त्यामुळे नदी ओलांडून त्यांना शाळेत जावं लागत होते. 

वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती. मात्र तरीही मुलावर वडिलांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याला परीक्षेसाठी आर्थिक मदत केली. वीरचे वडील गावात शेती करतात. अलीगड येथे महाविद्यालयात वीर यांनी मॅकेनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअर फिल्ड असूनही त्यांनी UPSC तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात वीर यांना अपयश आलं. मात्र जिद्द न हरता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसले त्यातही यश मिळालं नाही. २ प्रयत्नानंतर त्यांनी आणखी मेहनत घेतली आणि परीक्षेत यशस्वी झाले. दरम्यान, वीर प्रताप सिंह यांच्या मोठ्या भावाचंही आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये नोकरी स्वीकारली. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी