शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:10 IST

जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

केप टाऊन : जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.पृथ्वीचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरी त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे. जगभरातील १ अब्ज लोकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास खूपच कष्ट करावे लागतात, तर २.७ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना पिण्याचे पाणी मिळविणे जवळपास अश्क्य होते. जगातील ५०० मोठ्या शहरांमधील दर चारपैकी एका शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, असा निष्कर्ष या संदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.दुष्काळाचा जोरदार तडाखा बसलेल्या केपटाउनमध्ये सध्या जसे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे, तशी स्थिती बंगळुरूसह ११ शहरांमध्ये भविष्यात निर्माण होऊ शकते. भारत व चीनमधील शहरांतील वाढती लोकसंख्या व तिला मिळणारे पिण्याचे पाणी यांचे प्रमाण व्यस्त आहे. बंगळुरू शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्थाही येत्या काही वर्षांमध्ये तोकडी पडण्याची चिन्हे आहेत. पाण्याच्या पाइपलाइन अत्यंत जुनाट झालेल्या असून, त्या बदलणे आवश्यक आहे. पाण्याच्या गळतीमुळे व गैरवापरामुळे बंगळुरू शहरातील अर्धे पाणी हे सांडपाण्याबरोबर वाहून जाते. बंगळुरू शहरातील एकाही तलावाचे पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग केवळ औद्योगिक प्रकल्पांसाठी तसेच जलसंधारणासाठी होतो.जगातील ज्या अन्य शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, त्यामध्ये बिजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबूल, मेक्सिको, लंडन, साओ पावलो, जकार्ता यांचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.बंगळुरूमध्ये दमछाकबंगळुरू शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले जाळे विस्तारले. त्यानंतर देशभरातून तिथे काही लाख लोक राहावयास आले. शहराची संख्या वाढली. तसे बांधकामांनाही वेग आला. शहराचा विकास होऊ लागला. मात्र वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याची सोय करताना बंगळुरु शहराच्या पालिकेची व शासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWaterपाणी