शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...
2
"आयुष्य खटाखट नाही..."; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले
3
"मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून"; मंत्री उदय सामंतांनी थेटच सांगितलं
4
शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?
5
“आरक्षणविरोधी राहुल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड, जनताच आता उत्तर देईल”; भाजपाची टीका
6
आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल
7
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
8
“१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण
9
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
10
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
11
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
12
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
13
बाप्पाची सेवा करणारी 'ही' अभिनेत्री कोण? शाहरूख, सलमानसोबत हिट सिनेमांमध्ये केलंय काम
14
Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
15
Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं
16
“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल
17
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
18
जिंकलोsss.... संघाच्या विजयानंतर चक्क कुबड्या घेऊन आला मैदानात, केलं तुफान सेलिब्रेशन (Video)
19
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव

श्रीलंकेतील महापुरात 119 जणांचा मृत्यू तर 150 बेपत्ता

By admin | Published: May 27, 2017 10:20 PM

श्रीलंकेत आलेल्या पुराने अक्षरक्ष: हाहाकार माचवला असून या महापुरात आतापर्यंत 120 जणांनी आपला जीव गमावला आहे

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. 27 - श्रीलंकेत आलेल्या पुराने अक्षरक्ष: हाहाकार माचवला असून या महापुरात आतापर्यंत 120 जणांनी आपला जीव गमावला असून कित्येकजण बेपत्ता झाले आहेत. 2003 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत पुरामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भारताने तत्परतेने श्रीलंकेला मदत पाठवत नौदलाचे तीन जहाज रवाना केले आहेत. भारताने पाठवलेली मेडिकल आणि आपातकालीन टीम श्रीलंकेत पोहोचली आहे. भारताने पाठवलेलं "किर्च" शनिवारी कोलंबोत दाखल झालं. या जहाजातून औषध साहित्य पाठवण्यात आलं आहे. 
 
(श्रीलंकेत पावसाचे 91 बळी)
 
सखल भागात पाणी भरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने चेतावणी दिली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती खूपच बिघडली असून भारताने देवदूताप्रमाणे धाव घेत मदतीला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "गरज पडल्यास आम्ही श्रीलंकेतील आमच्या बहिण भावांसोबत उभे राहू".
 
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर व भूस्खलनाने श्रीलंकेत 119  जणांचा बळी घेतला आहे. देशातील 20 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.  गुरुवार व शुक्रवार मिळून देशात 300 ते 500 मिमी पाऊस झाला. काही भागात तर 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचे हवाई दल आणि नौदलाचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून मदत करीत आहेत. 2003 रोजी पावसाने व भूस्खलनाने देशातील दक्षिण भागात 250 नागरिकांचा बळी घेतला होता.
 
श्रीलंकेत आलेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे पश्चिम आणि दक्षिण भागात पूर आला आहे. पुराने गेल्या 14 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. बचावकार्यादरम्यान श्रीलंका नौदलाच्या एका जवानाचा हेलिकॉप्टरमधून पडून मृत्यू झाला. परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.