शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय

By admin | Published: July 13, 2016 2:46 AM

दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत.

जुबा : दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. वांशिक आधारावर फूट पडलेल्या दोन सशस्त्र गटांत गुरुवारपासून लढाई सुरू असून, भारतीयांनी भारतीय दूतावासासह विविध ठिकाणी आश्रय घेतला आहे. जुबातील भारतीयांची सुटका करण्याची योजना आखण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वटरवरून सांगितले. ‘दक्षिण सुदानमधील घडामोडींची मला कल्पना आहे, घाबरू नका. तुमचे नाव भारतीय दूतावासात नोंदवा,’ असे आवाहन त्यांनी सुदानमधील भारतीयांना केले. दुसरीकडे भारतीय दूतावासाने भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. ‘जुबातील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. तथापि, तुंबळ लढाई सुरू असून, जुबात तोफगोळ्यांचा मारा होत आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून, योग्य संधी मिळताच भारतीयांची सुटका केली जाईल. मात्र, सध्या तरी परिस्थिती प्रतिकूल आहे. विमानतळ बंद असून, रस्त्यावर जागोजागी अडथळे निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे तूर्त भारतीयांची सुटका करणे कठीण आहे,’ असे भारताचे दक्षिण सुदानमधील राजदूत श्रीकुमार मेनन यांनी सांगितले. ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण सुदानमधील शांतता पथकांत २,५०० भारतीय सैनिकांचा समावेश असून, त्यातील १५० सैनिक राजधानी जुबात आहेत. मात्र, त्यांना मदत करणे शक्य नाही,’ असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)अडकून पडलेल्यांत महाराष्ट्र पोलीस दलाच्या ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी संयुक्त राष्ट्र शांतता पथकात नेमणुकीला आहेत. पोलीस उपायुक्त शीला सैल यांचा यात समावेश आहे. त्यांच्यासोबत चार कनिष्ठ अधिकारी आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत केंद्राकडून काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तथापि, हे सर्व अधिकारी सुखरूप असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.