शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

“४०-५० वर्षांत जगभरात भारतासारखे कोणीही वागले नाही”; कॅनडाचा तिळपापड, आता प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 2:07 PM

Canada Vs India: भारताच्या भूमिकेवरून कॅनडाने नाराजी व्यक्त केली आहे.

Canada Vs India: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्येवरून गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध तणावग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भारतानेकॅनडाला अल्टिमेटम देत ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सांगितले होते. यासाठी १० ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. मात्र, यावरून आता कॅनडाचा चांगलाच तिळपापड झाला असून, गेल्या ४० ते ५० जगातील कोणताही देश भारतासारखा वागला नाही, असे कॅनडाने म्हटले आहे. 

कॅनडाचे माजी राजनैतिक अधिकारी यांनी भारताच्या अल्टिमेटमबाबत प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. गेल्या ४० किंवा ५० वर्षात अशी कोणतीही घटना घडल्याचे मला आठवत नाही. भारताकडून अशा प्रकारे अधिकाऱ्यांना माघारी पाठवणे सामान्य गोष्ट नाही, असे कॅनडाच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतातील कॅनडाच्या राजनैतिकांची संख्या कमी करण्याची निश्चित तारीख १० ऑक्टोबर होती. पण कॅनडाने भारतासोबत खाजगी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ही चर्चा निष्फळ ठरली.

भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भारताने २० ऑक्टोबरनंतर २१ कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सोडून इतर सर्वांचे विशेषाधिकार समाप्त करण्याबाबत माहिती दिली आहे. कॅनडाचे भारतात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता, आम्ही भारतातून ते सुरक्षित परततील ही बाब सुनिश्चित करत आहोत. 

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत भारतावर गंभीर आरोप केले होते, परंतु कॅनडा पोलिसांनी मात्र निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताच्या सहभागाबाबतच्या निष्कर्षप्रत पोहोचलो नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निज्जर हत्येबाबत गँगवॉरच्या दृष्टीनेही तपास करत आहोत. तूर्तास हत्येच्या कारणांबाबत स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांच्या या वक्तव्यानंतर मात्र दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत