शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'या' आजारामुळे बोटांचे ठसे नष्ट होतायत; नोकरी मिळणं कठीण, परदेशात जाण्यासही अडचण...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:46 IST

बोटांचे ठसे जवळजवळ जगभरात नैसर्गिक ओळख म्हणून ओळखले जातात.

गुन्हेगार पकडणे असो किंवा हरवलेल्या मुलाची ओळख पटवणे असो, बोटांचे ठसे नेहमीच उपयोगी पडतात. ओळखपत्र काढायला गेल्यावर सगळ्यात आधी बोटांचे ठसे घेतले जातात, बाकीच्या गोष्टी नंतर होतात. परंतु एक असा आजार आहे, ज्यामुळे बोटांचे ठसे नष्ट होत आहेत. 

बोटांचे ठसे जवळजवळ जगभरात नैसर्गिक ओळख म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या आजाराचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ओळखीचा मुद्दा...बोटांचे ठसे न उमटल्याने अनेक अडचणींचा सामना करायला लागू शकतो. यामध्ये नोकरी मिळण्यास, दुसऱ्या देशात जाण्यास अडचण निर्माण होऊ शकते. 

अॅडरमेटोग्लिफिया असं या आजाराचे नाव आहे. हा एक दुर्मिळ अनुवांशिक रोग आहे. ज्यामध्ये बोटांवर असणाऱ्या बारीक रेषा नष्ट होतात. हा आजार प्रमाण वाढू लागल्यानंतर वैज्ञानिकांनी देखील यावर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. अॅडरमेटोग्लिफिया हा आजार २००७मध्ये समोर आला होता. परदेशी वंशाची एक महिला अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करीत होती. तिचा चेहरा पासपोर्टच्या चेहऱ्याशी जुळत होता. मात्र सदर महिलेचे बोटांचे ठसे उमटत नव्हते. त्यामुळे विमानतळावर तपासणीसाठी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली.

बांगलादेशातही अशीच एक घटना समोर आली, पण ती एक-दोन लोकांची नाही तर संपूर्ण कुटुंबाची होती. राष्ट्रीय ओळखपत्र बनवण्यासाठी एका कुटुंबियाने सरकारी कार्यालय गाठले तेव्हा अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणाचेही बोटांचे ठसे उमटत नव्हते. अनेक दिवस प्रयत्न केले. मात्र त्यांच्या बोटांचे ठसे उमटलेच नाही. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र जारी करण्यात आले, परंतु त्यात त्यांच्या बोटांचे ठसे नसल्याचे नमूद करण्यात आले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Healthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयdocterडॉक्टर