शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

'घरातून बाहेर पडू नका...'; 'या' देशातील भारतीय लोकांसाठी सरकारने जारी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 6:00 PM

Advisory for Indians: भारत सरकारला असे आवाहन का करावे लागले, जाणून घ्या कारण

Advisory for Indians: आरक्षण हा मुद्दा सध्या भारतात सातत्याने चर्चेत आहे. त्यासाठी विविध प्रकारची निदर्शने होत आहेत. आता शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशातही हा मुद्दा पोहोचला आहे. बांगलादेशात आरक्षणाविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पण तेथे परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशात गेल्या ४ दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आंदोलकांनी आज संपूर्ण देशात बंदची हाक दिली आहे. या गोष्टीची तीव्रता पाहता भारतसरकारने ॲडव्हायझरी जारी केली आहे.

भारत सरकारची ॲडव्हायझरी

बांगलादेशातील परिस्थिती पाहता भारत सरकारने एक ॲडव्हायझरी जारी केली असून भारतीय लोकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. भारत सरकारने बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय आपत्कालीन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

सत्ताधारी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांवर आरोप

बांगलादेशच्या रस्त्यावर एका बाजूला पोलीस आणि सत्ताधारी पक्ष अवामी लीगशी संबंधित विद्यार्थी संघटना आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाला विरोध करणारे आंदोलक आहेत. बांगलादेशातील आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांनी सोमवारी ढाका आणि त्याच्या बाहेरील भागात शांततापूर्ण निदर्शने केल्याचा आरोप केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लाठ्या, दगड आणि चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे.

बांगलादेशातील सध्या आरक्षण कसे?

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५६ टक्के आरक्षण आहे. त्यापैकी ३० टक्के आरक्षण हे १९७१ च्या युद्धातील बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी आहे. १० टक्के प्रशासकीय विभाग, १० टक्के महिला आणि ५ टक्के आरक्षण वांशिक अल्पसंख्याकांसाठी आहे. याशिवाय शारीरिकदृष्ट्या अपंगांनाही सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतGovernmentसरकार