शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

आफ्रिकेतील गाम्बियानंतर आता इंडोनेशियात कफ सिरपचा कहर, ९९ मुलांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 5:19 PM

cough Syrup: आफ्रिकी देश गाम्बियामध्ये भारतातील एक कफ सिरप पिल्याने ६९ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता इंडोनेशियामध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे.

जाकार्ता - आफ्रिकी देश गाम्बियामध्ये भारतातील एक कफ सिरप पिल्याने ६९ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता इंडोनेशियामध्येही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. येथे ९९ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इंडोनेशियाने सर्व कफ सिरपच्या औषधांच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. इंडोनेशियाने दिलेल्या माहितीनुसार काही सिरपमध्ये असे घटक सापडले आहेत जे एक्यूट किडनी इंजरीसाठी जबाबदार असतात. या तत्त्वांमुळे इंडोनेशियामध्ये आतापर्यंत ९९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र ही औषधे आयात केलेली होती की त्यांचं उत्पादन स्थानिक पातळीवर झालं होतं, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

इंडोनेशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी मुलांध्ये एकेआयची सुमारे २०० प्रकरणांची नोंद केली आहे. त्यामधील बहुतांश पाच वर्षांखालील वयाचे होते. या महिन्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएचओने चार कफ सिरपबाबत जागतिक अलर्ट जारी केला होता, त्यामुळे हा अलर्टही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इंडोनेशियाच्या आरोह्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमध्येही हेच रासायनिक संयुग आढळून आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी भारताकडून सांगण्यात आले की, आयात करणारा देश हा सर्वसाधारणपणे औषध बाजारात पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी करतो. तर हरयाणातील औषध नियंत्रक आणि केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेने मिळून तपासणी सुरू केली आहे. मेडेन फार्माने औषध बनवताना काही आवश्यक पावले उचललेली नाहीत. तसेच अशा घटकांचा वापर केला ज्यांची कालमर्यादा संपली होती. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाHealthआरोग्य