शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:35 IST

चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले.

ठळक मुद्देचीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने 1962च्या युद्धाच्या फुशारक्या मारत धमकी देत आहे.भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील.जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल.

पेइचिंग : लडाखमध्ये 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीपासून दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत सरकारने सीमेवर तैनात असलेल्या सैन्य अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार दोन्ही देशांतील करारात बदल करण्याची पूर्ण सूट दिली आहे. याचा अर्थ, परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी गोळी चालवणे आवश्यकच आहे, असे अधिकाऱ्यांना वाटले, तर ते क्षणाचाही विलंब न करता जवानांना तसा आदेश देऊ शकतात. मोदी सरकारच्या या निर्णयामुळेच चीनला मिर्ची झोंबली आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

चीन मारतो 1962च्या युद्धाच्या फुशारक्या - चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. जर भारताने एकतर्फी सीमा व्यवस्थापन तंत्राचे उल्लंघण केले, तर चीनलाही चोख उत्तर द्यावे लागेल. मग, कुणाची मदतही भारताच्या कामी येणार नाही.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

भारताने गोळी चालवली, तर परिणाम भोगावे लागतील - चीनी माध्यमाने खुली धमकी देत लिहिले आहे, चिनी सैनिकंसोबत कराराचे नियम बदलने आणि गोळी चलवण्याची परवानगी दिल्याने भारताच्याच सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. भारतीय लष्कराने गोळीबार केलाच, तर चिनी सैनिकही याचे उत्तर देतील. भारताने सीमेवर शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला, तर चीनही यात सहभागी होईल. मग भलेही चीन रणनीतीकदृष्ट्या घेरला गेलेला असेल, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

1996मध्ये दोन्ही देशांत करार -भारत आणि चीन यांच्यात 1996 मध्ये करार झाला आहे, की एलएसीच्या दोन किलोमिटर परिसरात दोन्ही देश गोळी चालवणार नाहीत अथवा स्फोटकांसह गस्तही घालणार नाहीत. तसेच गस्त घालतानाही दोन्ही देशांच्या सैनिकांकडे असलेल्या बंदुकांचे बॅरल जमिनीच्या दिशेने असेल. 

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान