शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

दहशतवाद नामंजूर, ओलीस ठेवलेल्या बंधकांची सुटका झालीच पाहिजे; भारताने ठणकावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 8:02 PM

मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज असल्याचेही बागची यांचे मत

Arindam Bagchi India, Israel Hamas Palestine Conflict: गेल्या काही महिन्यांपासून गाझा पट्ट्यात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा पॅलेस्टाईनला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे भारताने पॅलेस्टाइन मधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, या भागातील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे तातडीची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, अरिंदम बागची म्हणाले. सध्या सुरू असलेला संघर्ष या प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या अहवालानंतर परस्पर संवादातील मानवाधिकार परिषदेच्या 55 व्या सत्रादरम्यान एका निवेदनात बागची यांनी हे सांगितले.

बागची यांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याच्या सार्वत्रिक बंधनाबाबत स्पष्ट असण्याची गरजही व्यक्त केली. बागची म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील सध्याची परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि मुलांचे नुकसान होत आहे. मानवतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंतेची आहे. हे स्पष्टपणे अस्वीकाहार्य आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध करतो.

दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे कायमच अयोग्य!

मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज आहे. हा संघर्ष प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दोन-राज्य तत्त्वावर आधारित इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढणे पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे झाले आहे यावर भारताने भर दिला. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. भारत आपल्या बाजूने द्विपक्षीय विकास भागीदारीद्वारे पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत राहील आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारत