शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल
3
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
4
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
5
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
6
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
7
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
8
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
9
बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..
10
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
11
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
12
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
13
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
14
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
15
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
16
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
17
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
18
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
19
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
20
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

Bangladesh Crisis : बांगलादेशात आता जमावाचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, १५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 10:36 AM

Bangladesh Crisis : सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही.

Bangladesh Crisis : ढाका : बांगलादेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांग्लादेशात असंतोष पसरला होता. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. 

सरकार, जनता, अधिकारी, न्यायाधीश आणि आता लष्कर. बांगलादेशात कोणीही सुरक्षित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. दरम्यान, आता लष्कराच्या जवानांवरही हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. गोपालगंज भागात लष्कराच्या वाहनावर जमावानं हल्ला केला आहे. 

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह १५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना गोळ्या लागल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

रिपोर्टनुसार, अवामी लीगचे हजारो नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक लोक माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या देशात परतण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी आंदोलकांनी ढाका-खुलना महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान, लष्कराचे वाहन तेथे पोहोचले आणि त्यांनी आंदोलकांना रस्ता खुला करून आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं. मात्र जमावानं त्यांच्यावर विटा फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी लाठीमार केला.

प्रत्युत्तरात, आंदोलकांनी लष्कराच्या वाहनाची तोडफोड केली आणि गोपालगंज कॅम्पचे लेफ्टनंट कर्नल मकसूदुर रहमान यांनी या घटनेची पुष्टी केली. जवळपास ३००० ते ४००० लोक जमले होते आणि त्यांनी रस्ता अडवला होता, असं मकसूदुर रहमान यांनी सांगितलं. तर गोपीनाथपूर संघाचे माजी अध्यक्ष लच्छू शरीफ यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. एका मुलासह दोन जणांना गोळ्या लागल्या. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.

दरम्यान, बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, आसाम पोलीस भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्टवर आहेत, जेणेकरून कोणीही बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश करू नये. पोलीस महासंचालक जी.पी. सिंग म्हणाले की, बांगलादेशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय