शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:02 IST

Bangladesh News: बांगलादेशच्या अटॉर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी बांगलादेशच्या घटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. देशामधील ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे संविधानामधून सेक्युलर शब्द हटवला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं होतं. तसेच तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून भारतात आश्रयाला लागलं होतं. त्यानंतर नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार स्थापन झालं होतं. मात्र हे सरकार सत्तेवर आल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान, आता मोहम्मद युनूस सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

बांगलादेशच्या अटॉर्नी जनरल मोहम्मद असदुज्जमान यांनी बांगलादेशच्या घटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे. देशामधील ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे संविधानामधून सेक्युलर शब्द हटवला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी ही मागणी न्यायमूर्ती फराह महबूब आणि देबाशीष रॉय चौधरी यांच्या पीठासमोर १५ दुरुस्तीच्या वैधतेच्या सुनावणीदरम्यान हा युक्तिवाद केला.

बांगलादेशचे अटॉर्नी जनरल मोदम्मद असदुज्जमान यांनी सांगितले की, आधी अल्लाहवर अतूट विश्वास आणि आस्था होती. आधी होतं तसंच पुन्हा व्हावं ही माझी इच्चा आहे. आर्टिकल २एमध्ये देश सर्व धर्मांचं पालन आणि समान अधिकारआणि समानता सुनिश्चित करेल, असं सांगण्यात आलं होतं. आर्टिकल ९ बांगला राष्ट्रवादाबाबत भाष्य करतो. या बाबी परस्पर विरोधी आहेत. घटनादुरुस्त्या हे लोकशाहीला प्रतिबिंबित करतात. त्यामध्ये हुकूमशाहीला प्रोत्साहन मिळता कामा नये. यावेळी असदुज्जमान यांनी कलम ७ए आणि ७बीवही आक्षेप घेतला.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटना वाढत असतानाच बांगलादेश सरकारने न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केला आहे. बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यापासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. तसेच येथील युनूस सरकारकडून कायम भारतविरोधी भूमिका घेतली जात आहे.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय