शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बांगलादेश पुन्हा पेटले; १०० ठार, एकाच पोलीस ठाण्याच्या १३ पोलिसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 7:47 AM

Bangladesh Riots, Protest : पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पेटला वाद; इंटरनेट बंद

ढाका: पंतप्रधान शेख हसीना राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला.. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात १४ पोलिसांसह १०० पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला असून ४०पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रणासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, ३ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला, त्याच १३ पोलिसांचा मृत्यू झाला.

शेख हसीना जानेवारी २०२४मध्ये पंतप्रधानपदी निवडून आल्या. मात्र, या निवडणुकीवर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. रविवारी बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. त्यांचा अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटला. आंदोलकांनी प्रमुख रस्ते रोखल्यानंतर राजधानी ढाक्यासह इतर शहरांमध्येही संघर्ष पेटला.

लष्कर मागे घ्या : माजी लष्करी अधिकाऱ्यांची मागणीहिंसाचार रोखण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केले आहे. मात्र, त्यांना रस्त्यांवरून मागे घ्या आणि बराकीमध्ये परत पाठवा, अशी मागणी माजी लष्करी अधिकाऱ्याऱ्यांनी केली आहे.

अशा प्रकारची निदर्शने रोखण्यासाठी लष्कराची शक्त्ती वाया घालवू नका, असे या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बांगलादेशच्या लष्कराने कधीही आपल्याच नागरिकांवर बंदु‌का रोखल्या नाहीत आणि त्यांना असे प्रशिक्षणही दिलेले नाही, असे माजी लष्करप्रमुख इकबाल भुयान म्हणाले.

यापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकला होता हिंसाचारकाही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी हिंसा भडकली होती. त्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो भारतीय विद्यार्थी तेथून भारतात परतले होते. सरकारने विविध श्रेणीतील ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते. हा निर्णय तेथील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता.

पुन्हा उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशातील भारतीय नागरिकांना उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी उच्चायुक्त कार्यालयाने एक संपर्क क्रमांक जारी केला आहे.

विद्यापीठात जाळपोळबंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय विद्यापीठात काही अज्ञात लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. १३ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप. मेसेंजर यासह सर्व सोशल मीडियावर तत्काळ बंदी घातली आहे.

ते दहशतवादी : पीएममोबाइल सेवादेखील सरकारने खंडित केली आहे. शेख हसीना यांनी हिंसाचारानंतर सुरक्षेसंदर्भात बैठक बोलाविली. त्यात तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, पोलीस तसेच इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. आंदोलन करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत, असे हसीना म्हणाल्या.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश