शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
3
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
4
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
5
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
6
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
7
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
8
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
9
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
10
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
11
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
12
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
13
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
14
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
15
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
16
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
17
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
18
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
19
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
20
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 'त्या' २ विद्यार्थी नेत्यांना बनवलं मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 4:05 PM

हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशात सत्तापालट झाली असून त्याठिकाणी लष्कराच्या राजवटीत अंतरिम सरकार देशात बनलं आहे. 

ढाका - बांगलादेशात मागील काही महिन्यांपासून हिंसा आणि अराजकता माजली असून देशात सत्तापालट झाली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. युनूस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये १६ सदस्यीय सल्लागार परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. त्यात विविध क्षेत्रातील लोकांची निवड करण्यात आली आहे. 

युनूस यांच्या कॅबिनेटमधील सर्वात जास्त चर्चा २ नावांची सुरु आहे. नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद अशी ही नावे आहे. नाहिद आणि आसिफ हे दोघे विद्यार्थी नेते आहेत. अलीकडच्या काळात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे हे नेतृत्व करत होते. याच आंदोलनामुळे शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडलं. देशभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ग्रुप स्टूडेंट अगेंस्ट डिस्क्रिमिनेशनचे आसिफ आणि नाहिद यांना नव्या कॅबिनेटमध्ये संधी मिळाली आहे. 

नाहिद इस्लाम देशाच्या दूरसंचार मंत्रालयाचे प्रमुख असतील. २६ वर्षीय समाजशास्त्रातील पदवीधर नाहिद इस्लाम विद्यार्थी आंदोलनात पुढे होते. त्यांना पोलिसांनी अटक केली होती. आसिफ महमूद यांच्याकडे युवक आणि क्रिडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. २५ वर्षीय आसिफ सायन्समधून पदवीधर आहे. आसिफ आणि नाहिद हे विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनले होते. त्यामुळे अंतरिम सरकार देशात येताच या दोघांना मोठी संधी मिळाली आहे.

युनूस यांनी स्वत:कडे ठेवले २७ मंत्रालय

अंतरिम सरकारचं नेतृत्व करणाऱ्या मोहम्मद युनूस यांनी त्यांच्याजवळ २७ मंत्रालय ठेवले आहेत. त्यात संरक्षण, माहिती प्रसारण, शिक्षण, ऊर्जा, खाद्य, जलसंधारणसारखे महत्त्वाचे विभाग आहेत. दुसऱ्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी माजी सचिव एम तौहिद हुसैन यांना परराष्ट्र खाते सोपवले आहे. निवृत्त ब्रिगेडियर जनरल सखावत हुसैन यांच्याकडे गृह मंत्रालय आहे. हुसैन २००७ ते २०१२ पर्यंत देशात निवडणूक आयुक्त होते. प्रोफेसर आसिफ नजरुल यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारी आहे. नजरुल यांनी उघडपणे विद्यार्थी आंदोलनाला समर्थन दिले होते.

बांगलादेशात शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता न्यायाधीशांना हटवण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांनी मुख्य सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सुप्रीम कोर्टाला घेराव घातला. त्यानंतर हे पद सोडत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यात विद्यार्थी नेत्यांचं म्हणणं आहे की, शेख हसीना या देशात परतल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या हत्यांबद्दल त्यांच्यावर खटला चालवावा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जवळपास ३०० लोक मारले गेले. त्यांच्या मृत्यूला शेख हसीना यांना जबाबदार धरलं जावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश