शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

"भारतानं बांगलादेशात हस्तक्षेप करावा, अन्यथा...", नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 12:48 PM

Muhammad Yunus : बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रेयेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बांगलादेशात सध्या ठिकठिकाणी हिंसाचार सुरु आहे. तसंच, पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात निदर्शनं सुरू आहेत. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा समोर आलं आहे, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ही निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, आता बांगलादेशी अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी याबाबत आपली व्यथा मांडली आहे. 

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर भारतानं दिलेल्या प्रतिक्रियेवर मुहम्मद युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, ही अशांतता शेजारील देशांमध्ये पसरू शकते, असा इशारा मुहम्मद युनूस यांनी दिला. मुहम्मद युनूस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "भारत जेव्हा म्हणतो की, ही अंतर्गत बाब आहे, तेव्हा मला दु:ख वाटते. भावाच्या घरात आग लागली तर ती अंतर्गत बाब आहे, असं कसं म्हणायचं? मुत्सद्देगिरीला अंतर्गत बाब म्हणण्यापेक्षा अधिक समृद्ध शब्दसंग्रह आहे."

गेल्या महिन्यात भारतानं बांगलादेशातील नोकऱ्यांच्या आरक्षणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य करण्यास नकार दिला होता. आम्ही हा बांगलादेशचा अंतर्गत मामला मानतो, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मुहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेशात अशांतता आहे, जिथं १७ कोटी लोक संघर्षात आहेत, तरुणांचे बळी जात आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे ही परिस्थिती केवळ बांगलादेशच्या सीमेपुरती मर्यादित राहणार नसून, शेजारील देशांवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताला बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आणि निवडणुकांमध्ये पारदर्शकता नसल्याची टीका मुहम्मद युनूस यांनी केली. तसंच, त्यांनी भारताच्या यशस्वी निवडणुकांचं कौतुक केलं आणि बांगलादेशमध्ये भारताचा पाठिंबा नसल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. या मुद्द्यांवर भारत सरकारशी चर्चा करण्याची योजना मुहम्मद युनूस यांनी आखली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात आरक्षणाविरोधात झालेल्या आंदोलनांमुळं पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

आतापर्यंत २८३ जणांचा मृत्यूजुलैमध्ये निदर्शने सुरू झाल्यापासून आतापर्यंत हिंसाचारात एकूण मृत्यूची संख्या जवळपास २८३ वर पोहोचली आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, परराष्ट्र मंत्रालयानं पुढील आदेशापर्यंत बांगलादेशला न जाण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतNobel Prizeनोबेल पुरस्कार