शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

बांगलादेशी भारतात घुसतायत, रोहिंग्या बांगलादेशात; ड्रोन हल्ल्यात २०० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 09:18 IST

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे.

भारताचे शेजारी एकामागोमाग एक बेजार होत चालले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये अराजकतेची स्थिती आहे. अशातच बांगलादेशात पंतप्रधानांना देश सोडून पळावे लागले आहे. बांगलादेशात हिंसाचार असल्याने हजारो बांगलादेशी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. अनेकजण घुसलेले आहेत. तर त्या बांगलादेशात म्यानमारचेरोहिंग्या घुसत आहेत. 

म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्य महिला, लहान मुले आणि अनेक कुटुंबेच्या कुटुंबे असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सने याचे वृत्त दिले आहे. या ठिकाणी मृतदेहांचे ढिगारे असल्याचे व आपल्या नातेवाईकाला लोक शोधत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी हा ड्रोन हल्ला झाला आहे. बांगलादेशच्या सीमेवर घुसण्याच्या प्रयत्नात असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी मिलिशिया आणि म्यानमार लष्कराने एकमेकांवर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चिखलाच्या जमिनीवर मृतदेहांचे ढीग विखुरलेले दिसत आहेत. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी २०० चा आकडा सांगितला आहे. 

रोहिंग्यांचा इतिहास...मुळचे बांगलादेशीचरोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमारचा बहुसंख्य बौद्ध समुदाय यांच्यातील वाद १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू आहे. अराकान या राज्यात १६ व्या शतकापासून मुस्लिम राहतात. या भागावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बांगलादेशातून अराकानमध्ये मजूर आणण्यास सुरुवात केली. यामुळे अराकानमधील मुस्लिम वस्ती वाढू लागली. या लोकांना रोहिंग्या म्हणून ओळखले जाऊ लागले. रोहिंग्यांची वाढती संख्या पाहून म्यानमारच्या जनरलने 1982 मध्ये बर्माचा राष्ट्रीय कायदा लागू केला. यानुसार त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तेव्हापासून रोहिंग्या मुस्लिम ना बांगलादेशचे ना म्यानमारचे राहिले, ते अनेक देशांत स्थलांतरीत होत आहेत.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारRohingyaरोहिंग्या