शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

नवाज शरीफांकडून बु-हान वाणीचं उदात्तीकरण, 'युवा नेता' असा केला उल्लेख

By admin | Published: September 21, 2016 11:49 PM

कश्मिरमध्ये भारताकडून मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे.

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. २१ : काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकांराचं उल्लंघन होत असून, तेथील जनतेवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरमधील  नव्या पिढीला स्वातंत्र्य हवं आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले आहे. भारताविरुद्ध त्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पाकिस्तानात दहशतवादाने हजारो लोकांचे बळी गेले आहेत, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ते संयुक्त राष्ट्र सभेत बोलत होते. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बु-हान वाणीला 'युवा नेता' संबोधून त्याचं उदात्तीकरण करण्याचाही प्रयत्न केला आहे. बुहरान वानी काश्मीरचा आवाज आहे. भारताने अलिकडेच काश्मीरमध्ये युवा नेते बु-हान वाणी याची हत्या केली. काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्यांसाठी स्वतंत्र चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे. काश्मीरमधून सैन्य हटवण्याची गरज आहे. आम्ही संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष 'बान की मून' यांचे स्वागत करतो, असं वक्तव्य नवाज शरीफ यांनी केलं. भारताने चर्चेसाठी अनावश्यक अटी ठेवल्या आहेत. चर्चा पाकिस्तानच्या बाजूने नाही तर दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने व्हायला हवी. सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही भारताला पुन्हा चर्चेचं आवाहन करतो. काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता नांदणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.