शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

"जर तुम्ही दहशतवाद पसरवला तर..."; इस्लामाबादमधून एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:49 PM

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर गेले आहेत. पाकिस्तानामध्ये शांघाय संघटनेची बैठक होणार आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी इस्लामाबादला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. या बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दहशतवाद असाच सुरू राहिला तर व्यवसायाला प्रोत्साहन देता येणार नाही. या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. जेव्हा दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात तेव्हाच परस्पर सहकार्य होऊ शकते. भागीदारी खरी असेल तेव्हाच सहकार्य शक्य आहे. एकतर्फी अजेंडांवरून संबंध प्रगती करू शकत नाहीत. एससीओच्या सनदेनुसार वागले तरच विकास साधता येईल,असा सल्लाही पाकिस्तानला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला.

एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...

"सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरतावादाचा वापर केला तर व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, जग कठीण परिस्थितीत आहे तेव्हा आम्ही भेटत आहोत. जगात दोन मोठे संघर्ष चालू आहेत, याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, असंही ते म्हणाले. एस. जयशंकर काल शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गेले आहेत. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावले आहे.

एस. जयशंकर म्हणाले की, विकास आणि प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे यात शंका नाही. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर विकासाची चर्चा होऊ शकत नाही, सर्वांनी मिळून कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले तर नवीन क्षमता विकसित होतील. यामुळे जगाच्या ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होईल. यामुळे जगात मोठ्या बदलांचा पाया रचला जाईल.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत